भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या कल्याणच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप अलिकडच्या काळात पूर्णपणे बदलले असले तरी तरुणांमधील उत्साह, सजावटीतील विविधता कल्पकता यामुळे तो अधिक आकर्षक ठरला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या कल्याणच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप अलिकडच्या काळात पूर्णपणे बदलले असले तरी तरुणांमधील उत्साह, सजावटीतील विविधता कल्पकता यामुळे तो अधिक आकर्षक ठरला आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक, खासगी, गणेशोत्सवांच्या संख्येत सतत वाढ होतआहे. यावर्षीही २० टक्क्यांनी गणपतींची संख्या वाढली आहे. कल्याण शहरात २९९ सार्वजनिक तर घरगुती ४२२५० आणि २६०५० गौरींची स्थापना झाली. उल्हास नगरात, अंबरनाथमध्ये ३०८ सार्वजनिक, ४५०७० घरगुती व २४५३८ गौराई होत्या. उल्हासनगरचे सार्वजनिक-खासगी गणपती कल्याणच्या गणेश घाटावर विसर्जनासाठी आणले जात आहेत.
कल्याणात सुभेदारवाडा गणेशोत्सवाने दर्जेदार कार्यक्रमांची आपली परंपरा आजही जपून ठेवली आहे. त्याचे स्वरूप आता मात्र विशिष्ट समाजापुत्रे मर्यादित झालेले दिसते. या मंडळात दर दोन वर्षानी शहरातील सामाजिक संस्थांकडे गणेश उत्सवाचे व्यवस्थापन दिले जाते. त्यामुळे महिलांच्या मंडळांनी ही या उत्सवाचे नेतृत्व केले आहे.
मंडळाचे जुने ज्येष्ठ कार्यकत्रे गंगाधरपंत जोशी यांच्या नावाने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो. तसेच महिला क्षेत्रात कार्य करणा-या महिलेला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. १९२३ साली कल्याण शहरात स्थापन झालेला सार्वजनिक गणेशोत्सव मेळासंघ आहे.
त्यांच्या गणपतींचे एकादशीला विसर्जन होते. यामागे धार्मिकतेबरोबरच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे कारण आहे. ज्यावेळी स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू होती. लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्वानाच आकर्षण होते. त्यामुळे एकादशीला कल्याणातील सार्वजनिक मेळा संघाच्या गणपतींचे विसर्जन करून कार्यकर्ते पुण्याला सार्वजनिक गणेशोत्सवात सामील होण्यासाठी जात.
पुढे पुढे मेळा संघाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत बेशिस्तीचे प्रमाण वाढले, असे कारण सांगून प्रकाश पेणकर वगरे मंडळी बाहेर पडली. त्यांनी कल्याण सार्वजनिक गणपती महासंघ स्थापन केला.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे आज तेच नेतृत्व करतात, मेळासंघात संघात १३ सार्वजनिक गणपती आहेत. रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन व्हावे अशा सूचना असल्या तरी गणपती मंडळांचा विसर्जन मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह मिरवणूक मार्गातील रस्त्यातील खड्डे, भाविकांची गर्दी, खाडीला येणारी भरती ओहोटी अशा अनेक कारणांमुळे विसर्जनाला उशीर होतो.
पहाटेपर्यंत विसर्जन कार्यक्रम संपत नाही. यामुळे गणपती विसर्जनाला सहाय्य करणारी कोळी समुदायातील मंडळी, पोलीस, महापालिका कर्मचारी यांच्यावर खूप ताण पडतो. पूर्वी काळा तलाव येथे गणपती विसर्जन होत असे. आता ते कल्याण खाडीत दुर्गाडी किल्ल्याजवळ गणेश घाटावर होत असते.
जुन्या पिढीतील कै. दत्तोपंत पिंपळे हे मराठी उद्योजक होते. त्यांचा डॉ. आंबेडकर रोडवर गणपती मूर्तीशाळा होती. ते शिल्पकारही होते. शिवाय कल्याणात सोपारकर, घोस्तेकर, बबनकुंभार, नरेश कुंभार, कल्याणकर, केमबुलकर असे तेरा ते चौदा मूर्तीकारांची पिढीजात कुटुंबे मूर्ती बनविण्याचे काम करतात.
पूर्वी कल्याणात धार्मिक-पौराणिक विषय घेऊन सार्वजनिक गणपतीच्या सजावटी होत. लंका दहन, रामरावण युद्ध, सीताहारण, कौरव पांडव युद्ध, कृष्ण लीला असे विषय घेऊन गणेश सजावटी असत. कल्याणातील एक कलाकार कै. वासू आमरे, तसेच कासार हाटातील प्रकाश साऊंड सव्र्हीस, प्रकाश टॉकीज, मारुती मंदिरातील हनुमान प्रासादिक मंडळाची सजावट, कासार हाटातीलमोरेश्वर पारींगे, रामबागेत अर्जुन कदम, विजय साळवी, यांच्या गणेशमूर्ती व सजावटी पहाण्यासाठी भाविकांची रात्रीच्या वेळी झुंबड होई.
नारायणपेठ गणेशोत्सवात दिनेश तावडे यांनी बुंदीच्या लाडवांचा, मार्केट मधील विविध प्रकारच्या, नाण्यांचा, स्वयंपाक घरातील पितळी भांडय़ांचा, मिठाईचा अशा निरनिराळ्या वस्तूचे गणपती बनवून आकर्षक सजावटीचा पायंडा पाडला. नंतर तावडे राजकारणात गेल्यावर ही पद्धत बंद पडली. आगरा रोडवर ठाणकरपाडा येथे थर्माकोलच्या बारीक नक्षीकामाची सजावट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असे.
सुभेदारवाडा गणपतीची सजावट विख्यात कलाकार राम जोशी हे कापडी पडदे व रंग यांच्या सहाय्याने राजमहालाची सजावट उभी करत. यात अलिकडच्या काळात ते थर्माकोलचा कल्पकतेने वापर करताना दिसतात. सिंडीकेट बिर्ला कॉलेज, चिकणघर वाडेघर हे भाग विकसित होत गेले. तसे आता तेथेही मोठय़ा सजावटी दिसू लागल्या आहेत.
गणेशदर्शनाकरता आजूबाजूच्या ग्रामीण भागातील, नव्याने विकसित झालेल्या भागातील भक्त मोठय़ा संख्येने येतात. या सर्व मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, गृहरक्षक दल तैनात असते. अनेक जुनी गणेशोत्सव मंडळे काळाच्या ओघात बंद झालेली दिसतात.
रामबागेत विजय साळवी हे विविध ऐतिहासिक मुख्यत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांवर आधारित गणपती सजावटी करतात. त्या नेहमीच वादग्रस्त ठरतात. कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलीस त्या मंडळावर बंदीची नोटीस बजावते पण अखेर न्यायालयातून त्यांना परवानगी मिळाली.
कल्याणात पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होत. त्यातून तरुणांना स्वतंत्र व्यासपीठ मिळे. शहरातील जुन्या पिढीतील बापूसाहेब फडके, फोटोग्राफर मोडक, डॉ.भा.का.मोडक शंकरराव झुंजारराव, कृष्णराव धुळप, रामभाऊ कापसे, के.टी.रामटेके, भगवानराव जोशी अशा दिगज नेत्यांचे नेतृत्व गणेशोत्सवाला लाभले.
गणेशोत्सवात अंध कलाकारांचा वाद्यवृंद, सुधीर फडके, गोिवद पोवळे, गजानन वाटवे असे डोंबिवलीतील गायक वृंदाचे कार्यक्रम होत. आज असे सर्व उत्सव बंद आहेत. पोलिसांना सहकार्य करण्यापेक्षा त्यांना अडचणीत आणून आपण कसे मोठ्ठे नेते आहोत हे दाखवण्यासाठी कोणत्याही मुद्यावरून गणेशोत्सवात वाद निर्माण करणारे कार्यकत्रे गणेशोत्सवात वाढले आहेत.
गणेशोत्सवात वर्गणी गोळा करण्यावरूनही वाद निर्माण होतात. आता नव्याने गृहनिर्माण संकुले निर्माण झालीत. त्यांचे स्वतंत्र गणेशोत्सव साजरे होऊ लागले. त्यामुळे वर्गणी गोळा करण्याचे प्रमाण कमी झाले. आपापल्या सोसायटीतील गणेश मंडळे झाल्याने, महिला, तरुण, स्थानिक बालकलाकारांच्या कलागुणांना चांगला वाव मिळाला.
कल्याणात पोर्टर चाळ, रेल्वे यार्ड, रेल्वे पोलीस मित्र मंडळ, कल्याण, कल्याण शहर पोलीस मित्र मंडळ, नारायणपेठ, जरीमरी गणेशोत्सव मंडळ, सुभेदार वाडा तेली समाज, सार्वजनिक गणेश मंडळ अशी ३० च्या वर जुनी मंडळे आहेत. ती आपापली वैशिष्टय़े राखून आहेत.
कल्याणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या ३०० पर्यंत पोहोचली आहे. त्या बरोबरच मंडळावर शासनाचे नियमही लादल्याने गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांत नाराजीचे वातावरण दिसते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे शहरवाढी बरोबरच वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येत भर पडली आहे. त्याबरोबरच बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. अशा वेळी गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेला पोलिसांना रस्त्यात मंडप न टाकता किवा त्यांचे आकार कमी करून सहकार्य केले तर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. भोवतीचे आरोग्य, स्वच्छता आरती म्हणताना ध्वनी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी मंडळांची आहे. हे लक्षात घेऊन एकमेकांच्या सहकार्याने उत्सव साजरा केला तर सर्वानाच त्याचा आनंद लुटता येईल.