गेली तीन वर्षे मालवण चौके ते कुर्ली-घोणसरी असा सुमारे ७० ते ७५ किमी अंतर डोंगर-द-यातून पार करून कुर्ली येथे हे धनगर बांधव उन्हाळयामध्ये सहयाद्रीच्या पायथ्याशी उघडया माळरानावर आपले संसार थाटत आहेत. येथे शेळया-मेंढयांना मुबलक चारा व पाणी मिळते. तसेच त्यांना चांगली किंमतही मिळत आहे. दिवसभर डोंगर-द-यामध्ये शेळया चारण्यासाठी घेऊन जाणे व सायंकाळी आपल्या ठरलेल्या तळावरती येऊन शेळयांना बसवणे हा दिनक्रम चालू असून शेळयांच्या लेंढीपासून शेती व बागायतींना सेंद्रिय खत मिळत आहे.
कणकवली- जमिनीचा कस सुधारावा यासाठी पूर्वजांनी बराच चाणाक्षपणा दाखवला होता. धनगर बांधवांना सांगावा धाडत त्यांच्या शेळया आपल्या शेतात बसाव्यात. जेणेकरून त्यांच्या विष्ठेतून शेतजमिनीचा पोत सुधारावा असा प्रयत्न असायचा. आजही ही परंपरा डोंगरद-यातील शेतीमध्ये जपली जात आहे.
डोंगरद-यांत राहून शेळया-मेंढया पालन करणारा धनगर समाज आर्थिक संकटात सापडला आहे. शेळया-मेंढयांना चारा आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय करताना धनगर समाजबांधवांना भटकंती करावी लागत आहे. मालवण चौके येथील झोरे, खरात व खरवते कुटुंबीय शेळया-मेंढया पाळण्यासाठी सहयाद्रीपट्टयातील र्पवतरांगांचा आसरा घेतला आहे.
कुर्ली गावच्या हद्दीमध्ये सध्या धरणाशेजारी भातशेत जमिनीत या शेळयांच्या कळपाला रात्रीचे वेळी बसवतात. शेळयांची लेंढी हे उत्तम सेंद्रिय खत आहे. त्यामुळे जमीनमालकाकडून दिवसाला पुरेल इतके धान्य घेतले जाते.
शेळयांची लेंढी हे उत्तम सेंद्रिय खत असल्यामुळे भातशेती, माड व काजू बागायतींसाठी याचा वापर शेतकरी करत आहे. उन्हाळाभर साठलेली लेंढी पावसाळयापूर्वी शंभर रुपये प्रति पोते याप्रमाणे विक्री केली जाते. कुर्ली गावातील पैलाडची बारी येथील विकास पाटील यांच्या जमिनीत सध्या त्यांचे वास्तव्य आहे.
गेली तीन वर्षे मालवण चौके ते कुर्ली-घोणसरी असा सुमारे ७० ते ७५ किमी अंतर डोंगर-द-यातून पार करून कुर्ली येथे हे धनगर बांधव उन्हाळयामध्ये सहयाद्रीच्या पायथ्याशी उघडया माळरानावर आपले संसार थाटत आहेत. येथे आल्यावर शेळया-मेंढयांना मुबलक चारा व पाणी मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा सहयाद्रीच्या पायथ्याशी ही कुटुंबे वास्तव्य करत आहेत.
बक-यांना चांगल्या प्रकारे येथे किंमत मिळत आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे सहयाद्रीच्या डोंगराचा आसरा या धनगर कुटुंबीय घेतला आहे. दिवसभर डोंगर-द-यामध्ये शेळया चारण्यासाठी घेऊन जाणे व सायंकाळी आपल्या ठरलेल्या तळावरती येऊन शेळयांना बसवणे हा दिनक्रम चालू असतो.
शेळयांच्या लेंढीपासून शेती व बागायतींना उत्तम प्रकारचे प्रकारचे सेंद्रिय खत मिळत आहे. जमिनीचा कसदारपणा टिकून राहावा म्हणून शेतकरी लेंढी या सेंद्रिय खताचा वापर करत आहे.
सध्या बहुतांश शेतकरी आपल्या शेतजमिनीमध्ये शेळयांचा कळप बसवून घेण्यासाठी प्रति दिवसासाठी अन्नधान्य किंवा रोख रक्कम दिली जात आहे. उन्हाळयात सहयाद्रीच्या पायथ्याशी असणा-या कुर्ली-घोणसरी, फोंडा, हरकूळ गावांच्या डोंगराळ भागात त्यांचे वास्तव्य असते. मेअखेरीस धनगर बांधव आपल्या शेळया-मेंढयासोबत चौके गावी दाखल होतात.
सहयाद्री पट्टयातील पर्वतरांगांमध्ये असंख्य काटेरी वनस्पती मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे. शेळयांना आवडीचा चारा सहयाद्री पट्टयात उपलब्ध होत असल्यामुळे शेळयांना पोषक आहार मिळत आहे. उन्हाळयामध्ये तीव्रपाणी टंचाई सर्वत्र भासत असल्यामुळे कुर्ली-घोणसरी धरणातील जलाशय मुबलक मिळत आहे. त्यामुळे सुमारे ४ ते ५ खंडी शेळयांना पाणी येथे मिळत आहे.
जानेवारीपासून एप्रिल मे महिन्यापर्यंत सुमारे ४ ते ५ महिने मालवण चौके येथील लक्ष्मण झोरे, नागेश खरात, नागू खरवते अशा तीन कुटुंबांतील १२-१५ स्त्री-पुरुष शेळया-मेंढयांना पालन करण्यासाठी एकत्र राहत आहेत. मालवण चौके परिसरात उन्हाळयात शेळयांना पाला-पाचोळा व पाणी मिळत नाही. त्यामुळे सहयाद्री पट्टयात वास्तव्य करावे लागत आहे.
शेळया-मेंढया पालन करणे हा पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी सध्या धनगर बांधवांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने धनगर समाजातील शेळया-मेंढयापालन करण्यासाठी शेतक-यांना शासनामार्फत सोयी-सुविधा मिळवून द्याव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.