कोकणातील कला व संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने मालवणी दशावतार ‘कालिया मर्दन’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण- कोकणातील कला व संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने मालवणी दशावतार ‘कालिया मर्दन’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणवासीयांनी या नाटकाचा मनमुराद आनंद लुटला. या वेळी विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धाही पार पडल्या. या कार्यक्रमाचे प्माध्यम प्रायोजक ‘प्रहार’ होते.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील मॉडेल इंग्लिश शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते सातवीच्या दोन गटांत निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. ‘आईची माया’ आणि ‘माझ्या स्वप्नातील आदर्श गाव’ हे निबंधाचे विषय होते. या स्पध्रेत ओमकार राजपुरे, वैष्णवी राऊत, शिवानी डुंबरे यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. आठवी ते दहावी या दोन गटांसाठी दुष्काळावर उपाययोजना आणि मराठी शिक्षणाची अवस्था हे विषय होते. त्यात चेतना म्हाडेश्वर, कोमल परब, पल्लवी आचरेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून सचिन आमडोसकर यांनी काम पाहिले.
श्री देवी भगवती दशावतार नाटय़ मंडळ कृत कालिया मर्दन देवगड-मुणगे डोंबिवली शाखा, प्रकाश लब्दे यांच्या वतीने हे दशावतार नाटक सादर करण्यात आले. या नाटकाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. मालवणी भाषेने सगळय़ा कोकणी माणसाला गावची आठवण करून दिली, अशी भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास विष्णू गायकवाड, वैभव गायकवाड, ‘प्रहार’चे वितरण सहव्यवस्थापक प्रणव भांबुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मालवणी माणसाला एकत्र आणण्यासाठी व समाजसेवेचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेऊन व मालवणी संस्कृती परंपरा जपण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ दोन वर्षापासून कार्यरत आहे.