संपूर्ण साष्टी (ठाणे जिल्हा) प्रदेश अनेक वर्ष पोर्तुगीज गुलामगिरीत होता. इ. स १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई मोहीम राबवण्यात आली, आणि ‘न भूतो न भविष्य’ असा विजय संपादन करण्यात आला.
संपूर्ण साष्टी (ठाणे जिल्हा) प्रदेश अनेक वर्ष पोर्तुगीज गुलामगिरीत होता. इ. स १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई मोहीम राबवण्यात आली, आणि ‘न भूतो न भविष्य’ असा विजय संपादन करण्यात आला. यामध्येच पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचारांना बळी पडलेल्या देवदेवतांच्या मंदिरांची पुनस्र्थापना करण्यात आली. त्यानंतर गावागावांतून देवतांची पालखी, मिरवणूक, देवीचा गोंधळ, उत्सवाची परंपरा पुढील शंभर र्वष सुरू राहिली.
१८व्या शतकात ब्रिटिश राजवटीचा अंमल महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मराठय़ांचे सण आणि उत्सव यांच्यावर बंदी आणण्यात आली. महाराष्ट्रातील गडकोट आणि तिथे जाण्याच्या वाटा ब्रिटिश सरकारने तोफा डागून उद्ध्वस्त केल्या. पुढील दीडशे वर्ष हे सण-सोहळे दडपशाहीने बंद करण्यात आले. १९४७च्या ऑगस्ट मध्ये भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर या पारंपरिक सोहळ्याची ऐतिहासिक कागदपत्रे आणि नोंदी बहुतांश प्रमाणात नष्ट झाल्या होत्या, आणि त्यामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढणारा परिणाम यामुळे अशा पालखी उत्सव आणि विजय दिन यांना कोणी वाली राहिलाच नाही. पण आजही काही मोजक्या गडकोटांवर विजय दिन, पालखी सोहळा असे उत्सव आजही दिमाखात साजरे होतात.
केळवे संवर्धन मोहीमअंतर्गत २००३ पासून प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यात केळवे-माहीम विजय दिन साजरा करण्यात येतो. या वर्षी येत्या १० जानेवारी २०१६ रोजी केळवे येथे श्री शीतलादेवी मंदिरापासून पालखी सोहळा सुरू होणार आहे. केळवे संवर्धन मोहिमचे प्रमुख योगेश पालेकर आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या परिसरात गडकोट स्वच्छता मोहीम राबवून हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला आहे. या विजय दिनानिमित्त किल्ले वसई मोहीम अंतर्गत श्री वज्रेश्वरी देवीची पालखी आयोजित केली जाते. याचसोबत भिवंडी येथील ज्येष्ठ शिवप्रेमी शेखर (मामा) फरमन (भिवंडी शिवस्पर्श प्रतिष्ठान, ठाणे) व भ्रमर संस्था, ठाणे यांचाही सहभाग या कार्यक्रमात असतो. या मोहिमेच्या अधिक माहितीसाठी संपर्क- अनुप मालंडकर – ९७०२०१०५०७.