गावच्या मातीचा गंध काही वेगळाच! त्यामुळेच की काय; प्रत्येकाच्या मनात आपलं एक गाव वसलेलं असतं. कामानिमित्त शहरात असलो तरी प्रत्येकाचा ओढा गावाकडे असतोच. ज्यांना जाता येत नाही ते कल्पनेतून आपल्या गावचं चित्र डोळय़ांपुढे उभं करत राहतात. ताणतणावाच्या काळात तर गावच्या कल्पनाच आपल्याला ‘रिलॅक्स’ करतात. या कल्पनांतून किंवा प्रत्यक्षात आपण आपलं गाव धुंडाळलं की, त्या मातीचा सुगंध आणखीनच हवाहवासा वाटतो. तिथल्या पायवाटा, गायी-म्हशींच्या गोठय़ांशेजारी खेळलेले ते खेळ, देवाळांतून निनादणारे घंटानाद, उघडया माळरानावर हंबरणारी, मस्ती करणारी गुरं आणि शेतातल्या पाटांतून खळाळणारं पाणी, रानावनातली ती विविध झाडं पाहिलं की, पुन्हा एकदा आपलं बालपण आपल्यासमोर दुडुदुडु लागतं.
खूप छान फोटो आहेत खरच बघून मनामधल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या . पण हे फोटो कोणत्या तालुक्यातून घेतले आहेत हे समजले नाहीत . सिमेंटच्या जंगलात जगण्यापेक्ष्य आपला गावच बर राव !