दोन-तीन दिवस झालेत, पावसाला थांबाय सवडच नाय. लावनी लावत व्हताव तवां वाट बगाय लावलान नि आता नको तेवडा कोसालतोय.
दोन-तीन दिवस झालेत, पावसाला थांबाय सवडच नाय. लावनी लावत व्हताव तवां वाट बगाय लावलान नि आता नको तेवडा कोसालतोय. इतका कोसलतोय की गुरां वाडयाच्या भायर पडाय मागत नायत. आनी या दिवसात गुरां वाडयात बांधाय परवडत नाय वो.
जल्ला वाडा डब-यान भरलाय. सुकी जागाच शिल्लक -हायलेली नाय. व्हतं कसं? पाऊस लय असला की चिलटं चावरं घरात वाडयात भरत आनि चावून चावून हैरान करतं. गुरां झाली तरी जीवच ना! वैतागतात. सारके पाय मांग पुडे नि शेपटीचे फटकारे मारत असतात. बरं शेपटी तरी सुकी असायचीय? नाय वो हिरवा चारा खातात नि शेनतात पिरपिरीत. मग शेपटेन रंगकाम चालूच.
वाडयात नुकोसा जीव होतो. बलवटावर भिंतीवर शेनाचा रंगकाम बगाय भेटतो. दुद काडाय बसलव की तुमाला पन चव-या ढालतात. मिलतोच यकुदा फटका तोंडावर पाटीवर. तां पन वल्या शेनाच्या सुगंधासोबत. घरात दुदाची किटली घेवन जावं तर बायका पोरां किटली तेवडीच घेतात नि नाकां मुटीत धरून ‘आंदी हातपाय धोवून या’ म्हनतात. बायको म्हनते, ‘वाडयात लोललेव की काय?’ काय सांगू आता हिला!
जोराच्या पावसामुले शेतीची कामा बंद. डोक्यावर सत्री घ्येता येल पन गुडघाभर पानी जिकडं तिकडं घराभायर पडू नयेसं वाटतं. आदीच चिकलात कुसलीलं पाय इनाकारन पान्यात टाकावसं वाटतच नाय. मरनाचा गारटा पडलीला. चुलीजवल पाय शेकवत बसावं तर बायको वराडते. ‘मला चुलीजवल कामां हायत. चुल सोडा. नायतर खायाला काय भेटायचं नाय.’
आताशा डीस घेतलेली हाय. तवा टीवी बगावा म्हनू टीवी लावावा तर ‘सिग्नल नॉट फाउंड’ म्हनू चौकट येते. मजे तो पर नाय. वेल दवडायचा कसा? पूर्वी बरं होतं. फुडच्या वटीच्या पडवेत पिरसा असायचा. सगल्या बापया-मंडलीनला त्याचा आसरा व्हता. शेकाय भेटायचं. गप्पा रंगायच्या.
गप्पा मारता परशात न इकलेल्या काजूच्या बिया, फनसाच्या आटला, अळवाच्या मुंडल्या भाजाय घालायच्या. गप्पा मारता मारता तोंड चाळवाय पुरेसं व्हयाचं. म्हातारा सांगायचा, ‘काजूच्या सालांच्या वासान सरपटनारी जनावरं पलतात. वासान ती घरात येतच नायत. जा थोडया बिया घेवन ये. धूर करतो. असली जनावरं तं पलतील.’
दोनी व्हयाचं. खायाला गर मिलायचे नि जनावरांची भीती पलायची. परश्यावर घोंगडया सुकायच्या नि परत पावसात भिजाय तयार व्हयाच्या. आता पिरसापन गेला नी घोंगडयापन नायसाटल्या. आता घोंगडयाची जागा पलास्टिकच्या पिशव्या नि रेनकोटान घेतलान. त्याला धग सोसत नाय. आनि मानसाला तेच्यात घोंगडीची उब पन मिलत नाय. कालाचा महिमा म्हनायचं दुसरं काय?
आमचे घरात म्हातारी गाडग्यात मडक्यात फनसाच्या आटला भरून ठेवीत असे. उपासच उपास असायचे सरावनात. त्यावेली भाजी कराय, भाजून खाया त्या उपेगी पडाव्यात म्हनू त्या ती ठेवीत असे. काय काय टायमाला पानी न मेलील्या आटला भरून ठेवलील्या असायच्या. त्यातली आटल भाजाय टाकलीव की फटाक्यांसांरा आवाज येयाचा. राक उडायची. नि केलीली चोरी पकडली जायची. काय काय टायमाला न्हान पो-यांच्या डोल्यात राक उडायची नि रडून ओरडून गोंधल व्हयाचा. नंतर आमानला कल्लं, मोटया मानसानी आटला भाजताना आवाज का व्हत नाय ता? अवो, त्या ठेचून मजे पंचर करून भाजायच्या असतात. काजूचा आवाज व्हत नाय पन तेल जलतानाचा फरफर-फरफर आवाज येतो. पन सगल्यात भाजी मंजे एक बी भाजलीव तरी सगल्या वाडीत वास परमालतो.
न्होकून -हान्यातली गोष्ट न्हवं ती. राजरोस सांगूनच भाजाय घेयाच्या. पिरसा गेला त्याच्यासोबत व्हयी सगली मजा लोपली. आता पोरानला पिरसा मंजे काय हय़े इचारावं लागंल. त्यानला कसं पटवावं पिरसा मंजे शेतक-याचा एक अविभाज्य भाग व्हता, सगलं लाकूडसामान घराची रीप, वासे, कीडी भुंग्यापासनं वाचवन्याचं जालीम वशीद होतं. म्हाता-यांची त्यातल्या त्यात बिनकामी बसलेल्या पुरुषांच्या धगाजवल शेकन्याची हक्काची जागा व्हती.
गावकीपासनं दिल्लीच्या राजकारनाची म्हायती गावन्याचं ठिकान व्हतं. मुलानला गोष्टी सांगनारं आनि सांगनारं ठिकान व्हतं. हां थोडा धूर घरात व्हयाचा. भिंती काल्या व्हयाच्या पन अनुभवाचं अंजान डोल्यात घालून डोलं साफ करन्याचं, खरी नजर आनन्याचं, करत्याला जागं ठेवायचं ठिकान व्हतं. काल बदालला तशी o्रद्धास्थानं बदालली. तुमीच बगा ना आटवत असलं तर ओटीवरची आरामखुर्ची कापडाची ती पन टारपोलीनच्या, कुटं दिसतेय? असलीच कुनाकडं तर ती माल्यावर अडगलीत पडलेली असंल बेवारशी.
वटीवर होती तवां त्या खुच्र्येची जरब व्हती, रिकाम्या खुरचेत बसायचीपन कुनाची छाती न्हवती. मोटय़ांचा मान व्हता तो. आदराचं ठिकान सगल्यांचं. पन आता त्याची जागा सोफ्याच्या शेटनी घेतलान. कुनीपन येवं नी तंगडया वर करून बसावं. न्हान नाय मोटा नाय हाच तो कालाचा महिमा. गेले ते दिवस. त्यातल्या त्यात बरं वाटतं, काय काय लोकांनी व्हया जुन्या खुर्च्या, डेस्क, दौतखाना, आंटीक पीस म्हनू जपून पॉलीस करून चकचकीत दिवानखान्यात लखलखीत करून ठेवलानी हायत.
हय़े काय कमी न्हवं. गाडगी मडकी जुने कंदील रंगकाम करून दिवानखान्यात आरामात बसलीले दिसतील. शहरातनं काय काय खानावलीत होटेलात गावाकडच्या घरात आलील्यासारकां फिल आनलीला. खरंच लांब दांडयाची सत्री, खुंटय़ेला लोंबत्येय, दोरयेची वेटोली, आकडी कोयती, यका खुंटेला कालाकोट-काली टोपी, तांब्या पितलेचे चकचकीत तांब्ये भांडी अगदी कोकनातलं घर वाटावं. लोकानला आवाडतं पन गर्दी करतात.
नायतरी गावातल्या घरात -हायाला जातोय कोन? पोरानला कलतं, असंच कायसं असल गावात. पन जेवाय बसलेव की न्हान न्हान इस्टीलच्या बादल्या, कढया, घमेली बगतली की मला मात्र गोठयातल्या म्हशीला आंबवन घातलील्यासारं वाटतं. आमी गोटयात म्हशीसंबूर ठेवत व्हतो पन हे आमच्या पुढयातल्या टेबलावर ठेवतात इतकंच. आमी घमेलं म्हैस संपवतेय कवा नि मी तं उचलतोय कंवा याची वाट बगायचो. आता हे वेटरलोक, हे खादाड खाऊन जातात कंवा नि दुस-या गि-हायकाला बसवतोय कवां? या विचारात उबे असतात.
त्याला पन कारन हाय. जेवडी गि-हायकं जेस्ती तेवडीच टीप जास्ती. कसं? आग्रव करतात पन ता टीप मिलन्यासाटनं, मला ठावं हाय. जल्ला विषय खलीकडनं खलीकडं गेला बगा. गावचं घर मजे आमचा वीकपॉइंट. बोलाय लागलो की थांबायचं कुटं कलत नाय. काय का असंना, थोडीतरी संस्कृतीची जपनुक होतेय. पन खरी मजा बगाय कोकनातलं घर इसरू नुका. मनाची शांती, आराम, खरं सुख तिथंच गावल. कितीबी भटका, देश-विदेशात जरी गेलेव तरी घर तं घरच. ते पन गावचं.