महागाईतील चढ-उतार पाहता रिझव्र्ह बँकेला आणखी काही काळ व्याजदर चढे ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शुक्रवारी व्यक्त केले.
नवी दिल्ली- महागाईतील चढ-उतार पाहता रिझव्र्ह बँकेला आणखी काही काळ व्याजदर चढे ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शुक्रवारी व्यक्त केले. सध्या महागाईचा पारा उतरला असला तरी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरबीआय महागाई नियंत्रणासाठीचे कडक पतधोरण यापुढेही राबबावे लागेल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
येत्या वर्षभरात महागाईचा अर्थव्यवस्थेवर दबाव राहील. अन्नधान्य आणि इंधनाच्या किमती वाढल्यास महागाईचा पारा चढेल, असा अंदाजही नाणेनिधीने व्यक्त केला आहे. गेल्या तीन महिन्यांत अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या तर प्रमुख महागाईमध्येही घट झाली.
मात्र असे असले तरी रिझव्र्ह बँकेने आपल्या शेवटच्या पतधोरणात व्याजदर पाव टक्क्याने वाढवले होते. यापुढेही बँकेचा कठोर पतधोरणावर भर राहील, असे नाणेनिधीने म्हटले आहे. चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ४.६ टक्के दराने विकास पावेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.