गेल्या काही वर्षांत सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होत असून लोकसभा निवडणुकीतील अनेक उमेदवारांची संपत्ती वाढण्याचे कारण सोने नसून चांदीचे वाढलेले दर असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होते.
नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांत सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होत असून लोकसभा निवडणुकीतील अनेक उमेदवारांची संपत्ती वाढण्याचे कारण सोने नसून चांदीचे वाढलेले दर असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोने, जमीनजुमला यासोबतच चांदीच्या संपत्तीचाही समावेश केला आहे.
गेल्या पाच वर्षातील चांदीचे वाढते दर हे उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्ती वाढवण्यास कारणीभूत ठरले आहेत.
निवडणुकीतील उमेदवारांची संपत्ती जाणून घेण्यासाठी क्लिक करा
सर्वसामान्यांचे पांढरे सोने समजले जाणारी चांदीचे भाव गेल्या पाच वर्षात दुप्पटीने वाढले असून सध्या चांदीसाठी किलोमागे ४३ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या चांदीच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात सुमारे २१ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे ८८ किलो चांदी आहे. २००९ मध्ये याची किंमत होती १८.३७ लाख तीच किंमत २०१४ मध्ये ३९.१६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. मात्र चांदीच्या संपत्तीमध्ये कोणतीच वाढ नाही.
ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा या आरएलडी पक्षाकडून उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवत आहेत. २००९ मध्ये त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये १.५ किलो चांदीची किंमत होती ३० हजार रुपये मात्र सध्याच्या भावानुसार या किंमतीमध्ये वाढ होऊन ती ६९ हजारांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर भाजपच्या ज्येष्ठ नेता सुषमा स्वराज यांच्याकडे असलेल्या ५.५ किलो चांदीची किंमत २.३६ लाख इतकी आहे. २००९ मध्ये त्यांच्याकडे फक्त ४०० ग्रॅम चांदी होती.
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या सदस्य प्रेणीत कौर यांच्याकडे तीन लाख रुपयांची चांदी आहे. तर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे ४.३ लाख रुपयांची चांदी आहे.
चांदीच्या या भाववाढीमुळे महिला उमेदवारांसोबतच पुरुष उमेदवारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. भाजपमधून बाहेर पडलेले आणि बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणारे जसवंत सिंग यांच्याकडे सात किलो चांदी आहे. गेल्या पाच वर्षात वाढ होऊन या चांदीची किंमत ३२ लाख रुपयांवर पोहोचली आहे.