चेन्नईतील रेल्वेत झालेल्या दोन बाँबस्फोटांचा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
नवी दिल्ली- चेन्नईतील रेल्वेत झालेले दोन बाँबस्फोट हे अत्यंत निराशेची मनस्थिती असलेल्या रानटी वृत्तीच्या लोकांनी केलेला भ्याड हल्ला आहे. या हल्ल्याचा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
या भ्याड हल्ल्यांना चोख उत्तर देण्यास आपण समर्थ असल्याचेही सांगत त्यांनी तामिळनाडू सरकारला केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेबाबत आणि जखमी झालेल्या प्रवाशांचे सांत्वन करत त्यांनी या दु:खात सरकार आणि संपूर्ण देश आपल्यासोबत असल्याचा दिलासा पंतप्रधान कार्यालयातून दिलेल्या पत्रात दिला आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनीही या दुहेरी बाँबस्फोटाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
[EPSB]
चेन्नई रेल्वे स्थानकात दोन स्फोट »
चेन्नई रेल्वे स्थानकात झालेल्या दोन बाँबस्फोटांत एका महिलेचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले.
[/EPSB]