सोनू निगम हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. तो मूळचा हरयाणाचा असून ३० जुलै १९७३ रोजी त्याचा जन्म झाला. चित्रपटांसाठी पार्श्वगायन करण्याव्यतिरिक्त त्याने स्वतंत्र अल्बमही केले आहेत.
सोनू निगम हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. तो मूळचा हरयाणाचा असून ३० जुलै १९७३ रोजी त्याचा जन्म झाला. चित्रपटांसाठी पार्श्वगायन करण्याव्यतिरिक्त त्याने स्वतंत्र अल्बमही केले आहेत. तसंच काही चित्रपटांमधून त्याने अभिनयही केला आहे, पण त्यात तो फारसा यशस्वी ठरला नाही. वयाच्या तिस-या वर्षापासून त्याने गायनाला सुरुवात केली. वयाच्या १९व्या वर्षी तो वडिलांबरोबर मुंबईत आला.
१९९० साली ‘जानम’ या चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं.‘सारेगामा’ या कार्यक्रमाने त्याला ओळख दिली. ‘संदेसे आते है, ये दिल दिवाना’ यासारखी गाणी गाऊन त्याने आपल्यावरचा मोहम्मद रफींची नक्कल करत असल्याचा शिक्का पुसून काढला. गाणं गात असताना त्या गीतातल्या भावना उत्तमपणे गाण्यातून उतरवणं, गाण्याप्रमाणे आवाजाचा पोत बदलणं, यामुळे त्याचं नाव उत्तम गायकांमध्ये गणलं जाऊ लागलं.
२००४ साली ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील शीर्षकगीतासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदीप्रमाणेच त्याने बंगाली, उडिया, कानडी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमातलं त्याने गायलेलं ‘टिक टिक वाजते डोक्यात’ हे गाणं प्रचंड गाजत आहे.