आगामी झिम्बाब्वे दौ-यामध्ये भारताच्या काही अनुभवी क्रिकेटपटूंना विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – आगामी झिम्बाब्वे दौ-यामध्ये भारताच्या काही अनुभवी क्रिकेटपटूंना विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
नुकताच भारताचा बांगलादेशविरुद्ध मालिका झाली. या मालिकेत भारताचा १-२ ने पराभव झाला. त्यामुळे निवड समिती आगामी झिम्बाब्वे दौ-यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली आणि स्पिनर आर. अश्विनला विश्रांती देण्याची शक्यता आहे.
त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. तर कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा अथवा सुरेश रैना यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित या स्पर्धेत आघाडीवर आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांत विश्रांती देण्यात आलेला अजिंक्य रहाणे १० जुलैपासून सुरु होणा-या मालिकेत खेळणार आहे. झिम्बाब्वे दौ-यात तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे.