देशातील नऊ निवडक रेल्वे मार्गांवर हायस्पीड ट्रेन चालवण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
नवी दिल्ली – देशातील नऊ निवडक रेल्वे मार्गांवर हायस्पीड ट्रेन चालवण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या मार्गांवर ताशी २०० कि.मी.वेगाने ट्रेन चालवण्यात येईल असे प्रभू यांनी सांगितले.
सध्या या मार्गांवर ताशी ११० ते १३० कि.मी. वेगाने ट्रेन धावतात. हा वेग १६० ते २०० कि.मी. पर्यंत वाढवण्यात येईल. यामुळे दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-मुंबई हा प्रवास एकारात्रीत पूर्ण होईल. हा वेग वाढवाताना रेल्वे ट्रॅकमध्ये सुधारणा करण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल असे प्रभू यांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर घोषणा झालेल्या बुलेट ट्रेनचा अभ्यास सुरु असून, यावर्षाच्या मध्यापर्यंत त्याचा अहवाल सादर होईल. अहवाल मिळाल्यानंतर लगेचच पावले उचलू असे प्रभू यांनी सांगितले.