नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला असून जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही’, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
रायपूर- ‘छत्तीसगडमधील सुकूमा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनावर नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला ही थंड डोक्याने केलेली हत्या आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला असून जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही’, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रायपूर येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नक्षलींचा खात्मा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्त मोहिम राबविण्यात येणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हणाले.
डाव्या कट्टरतावादाच्या रणनितीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. डाव्या कट्टरतावादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही डावपेच आखत आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या रणनितीत बदल घडवून आणू आणि वेळ पडल्यास नक्षलग्रस्त भागांना भेट देऊन त्याप्रमाणे व्यूहरचना आखण्यात येईल, असे सिंह यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रमण सिंह हेदेखील उपस्थित होते. ८ मे रोजी राज्य सरकारांच्या अधिका-यांशी स्वतंत्रपणे बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री रमण सिंह आणि राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी छत्तीसगडमधील माना कॅम्प परिसरात चौथ्या बटालियनच्या मुख्यालयात माओवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर सिंह यांनी मुख्यमंत्री आणि अन्य अधिका-यांची बैठक घेतली.