तामीळनाडूतील १४ उमेदवारांकडे ‘शून्य’ मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
चेन्नई – लोकसभा निवडणूक लढवणारे सर्वच उमेदवार अत्यंत श्रीमंत असतात, असा सर्वाचाच समज आहे. देशातील अनेक उमेदवारांची बहुतांशी सांपत्तिक स्थिती उत्तम आहे, यात शंका नाही. मात्र, तामीळनाडूतील १४ उमेदवारांकडे ‘शून्य’ मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
तामीळनाडूत ८४५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १४ उमेदवारांकडे मालमत्तेऐवजी पाच कोटींपेक्षा अधिक कर्ज असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती डेमोक्रॅटिक फॉर रिफॉर्म्स तामीळनाडू इलेक्शन वॉच या संस्थेने दिली आहे.
एस. राजेश्वरी, बालन पी. पी., पारगुनन, पोन्नुस्वामी पी., एझुमलाई ई या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तसेच एच. वसंतकुमार यांच्यावर ८७ कोटी रुपयांचे कर्ज आहे.