लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल पुरवठा कंपन्यांना दर वाढवण्यास मनाई केली आहे.
नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेल दरावरून नेहमीच सर्वसामान्य जनता नाराज होत असते. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल पुरवठा कंपन्यांना दर वाढवण्यास मनाई केली आहे.
जून २०१०मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रण मुक्त केल्यापासून दर १५ दिवसांनी सुधारीत दर जाहीर केले जातात. यावेळी मात्र सरकारने वाढवण्यापासून रोखले आहे.
याआधी एकच महिन्यात दोन वेळा पेट्रेलच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावेळी पेट्रोलच्या दरत ४० ते ५० पैशांची वाढ अपेक्षीत होती. याआधी एक एप्रिल रोजी ७५ पैशांनी तर १६ एप्रिल रोजी ७० पैशांनी पेट्रेलच्या दरात कपात करण्यात आली होती.
तर डिझेलच्या विक्रीत प्रती लिटरमागे सहा रुपये ७०पैशांचा तोटा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.