तुमच्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांना त्यांची फोन चार्जिग करण्याची सवय बदलण्याची गरज असेल. अनेक जण फोन चार्जिग करताना काही चुका करतात आणि नंतर फोन खराब झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होतो. या चुकांमुळे केवळ फोन नाहीतर फोनची बॅटरीही खराब होते. काही वेळा सहा महिन्यांतच फोनची बॅटरी खराब होते. चला जाणून घेऊया अशाच पाच चुका ज्या तुम्ही फोन चार्जिग करताना कधीही करू नका.
>> ओरिजिनल चार्जरनेच फोन चार्ज करा :
अनेक जण आपला चार्जर न वापरता दुस-या किंवा डुप्लिकेट चार्जरने फोन चार्ज करतात. पण हे चुकीचं आहे. कधीही तुमच्या फोनच्या ओरिजिनल चार्जरनेच फोन चार्ज करावा. याने फायदा हा होईल की, तुमच्या फोनची बॅटरीचे आयुष्य वाढतं. त्यासोबतच चार्जिग पॉइंट खराब होणार नाही आणि फोन लगेच चार्ज होईल.
>> फास्ट चार्जरला करा दूर :
आजकाल बाजारात कितीतरी फास्ट चार्जर उपलब्ध आहेत. पण हे फास्ट चार्जर तुमच्या फोनसाठी कोणत्याही शत्रूपेक्षा कमी नाहीयेत. या चार्जरने तुमचा फोन कमी वेळात चार्ज तर होतो, पण फोनची बॅटरी निकामी होते.
>> फोन रात्रभर चार्जिगला लावू नका :
अनेकांना रात्रभर फोन चार्जिगला लावण्याची सवय असते. पण मुळात कोणताही फोन चार्जिग होण्यासाठी २ ते ३ तास वेळ लागतो. जर तुम्हीही असे करत असाल तर यापुढे हे करू नका. असे केल्याने फोन गरम होतो आणि बॅटरीही खराब होते.
>> पावर सेव्हर अॅपपासून दूर राहा :
अनेक जण बॅटरी वाचवण्याचा दावा करणारे थर्ड पार्टी अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करतात. पण या अॅपमुळे फोनचं नुकसान होतं. खरं तर असे अॅप फोनवर प्रेशर निर्माण करतात. त्यामुळे फोन हँग होऊ लागतो.
>> १०० टक्के चार्जिग करू नका :
कधीही फोन ८० टक्क्यांपेक्षा जास्त चार्जिग करू नका. कारण यामुळे बॅटरी गरम होऊ लागते आणि बॅटरीचं लाईफ कमी होतं.