वादग्रस्त विधाने करुन नेहमीच चर्चेत असणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.
पाटणा – वादग्रस्त विधाने करुन नेहमीच चर्चेत असणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.
९० टक्के पुरुष हे दुस-यांच्या पत्नीसोबत फिरायला जातात तर केवळ दोन ते पाच टक्के पुरुषच आपल्या पत्नीसोबत फिरायला जातात, असे वादग्रस्त विधान करुन मांझी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
प्रेयसी असण्यात काहीच गैर नाही. जर पुरुष आणि स्त्री या दोघांची सहमती असले तर संबंध ठेवण्यात काही चुकीचे नाही. नातेसंबंध असण्यात काहीच गैर नाही, असे मांझी यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.