लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याचे आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव जाहीर केले.
पाटणा- लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याचे आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहार काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी बुधवारी सायंकाळी अधिकृत घोषणा केली.
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी आरजेडी २७ जागा आणि काँग्रेस १२ जागांवर निवडणूक लढणार आहेत. तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे.
काँग्रेस ससाराम, किसानगंज, औरंगाबाद, सुपौल, हाजीपूर, पुर्णी, पटना साहेब, नालंदा, समस्तीपूर, गोपालगंज, मुझफ्फरपूर आणि वाल्मिकीनगर येथून निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीला कतीहारची जागा सोडण्यात आली आहे. उर्वरीत जागांवर आरजेडी निवडणुक लढणार असल्याचे लालू यांनी सांगितले.