बिझनेसच्या क्षेत्रात खूप क्रांतिकारक बदल होत आहेत आणि बाजारपेठेमध्ये निर्वविादपणे सकारात्मक वाढ दिसू लागली आहे. डिजिटल इंडियामधून नागरिकांना तंत्रज्ञान उपलब्ध होईल याची खातरजमा केली गेली आहे आणि त्यातून भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डिजिटलदृष्टय़ा सक्षम बनवण्यात आले आहे. मोबाईल उद्योगाच्या वाढीला किंवा पुढील पावलांना चालना देणारे काय आहे, हे आपण समजून घेऊ या.
निश्चलीकरणानंतर डिजिटल चलनाचा अंगीकार केल्यामुळे एकूणच आयटी उद्योगात आणि भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत एक नवीन दृष्टिकोन आला. डिजिटल चलन/ऑनलाइन प्रदान वाढू लागल्यामुळे नवीन मागणीच्या पूर्ततेसाठी फोरजीचा प्रसार आक्रमकतेने होऊ लागला. स्मार्टफोन बाजारपेठेत वार्षकि पातळीवर १०० टक्के वाढ दिसून आली असून प्रत्येक वर्षी नवीन मार्ग आणि नवीन प्रवाह दिसू लागले आहेत. यासोबत या वर्षात ई वाणिज्यच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आणि त्यामुळे वापरकत्रे इंटरनेटशी आणि त्यांच्या स्मार्टफोनशी जास्त प्रमाणात जोडले गेले. स्मार्टफोन्समधून वैविध्यपूर्ण सेवा देण्यास सुरुवात झाली. फक्त दूरध्वनी करणेच नाही तर ऑनलाइन खरेदी, ऑर्डर देणे, व्यवहार करणे आणि इतर गोष्टी सुरू झाल्या. बँकेचे नेहमीचे व्यवहारदेखील आता डिजिटल झाले आहेत. अलीकडे केलेल्या अभ्यासातून हे दिसून आले की सुमारे ६० टक्के ग्राहक २०१७ मध्ये त्यांच्या फोनचा वापर आपल्या बँकेतील शिल्लक, नुकतेच केलेले व्यवहार पाहणे, बिले देण्यासाठी किंवा फंड ट्रान्स्फरसाठी करत होते. त्यापाठोपाठ व्यवसाय आणि संवाद साधन म्हणून अॅप्सची भूमिका महत्त्वाची होती आणि हाच प्रवाह आगामी कालावधीतही सुरू राहणार आहे.
आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) हा आणखी एक महत्त्वाचा घटक अस्तित्वात आला. भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मोबाईल विकासाला मागील काही वर्षात मोठी चालना मिळाली आहे आणि हाच प्रवाह स्मार्टफोन आणि आयओटी आणि वापरण्यायोग्य उपकरणांपर्यंत विकसित झाला आहे. आयओटीवर आधारित सोल्यूशन्स फक्त शहरी भारतातच नाहीत तर ती ग्रामीण नागरिकांनाही पूर्वी त्यांच्या हाताबाहेर असलेल्या सेवा देत होती. सरकारने देशभरात स्मार्ट सिटीजच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. याचाच अर्थ असा की, आयटी कंपन्या दळणवळणाच्या साधनांच्या निर्मितीत आणि शासकीय संस्था तसेच नागरिकांना सेवा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतील. आयओटीचे तंत्रज्ञान याबाबत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. आयओटी आणि बिग डेटा यांचाही सध्याच्या मोबाईल अॅप प्रकल्पांवर मोठा प्रभाव आहे. सरकारी पातळीवरून झालेल्या बदलांबरोबरच या उद्योगात तंत्रज्ञानाचा स्पर्श होऊन मोठय़ा सुधारणा झाल्या आहेत आणि ग्राहकांच्या अपेक्षांशी संतुलन साधण्यात आले आहे.
डिजिटल चलन/ ऑनलाइन पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे नवीन मागणीला पाठबळ देण्यासाठी आक्रमक फोरजीच्या प्रसाराला प्रोत्साहन मिळाले, असे मत झिऑक्स मोबाईल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक काबू यांनी व्यक्त केले.
वाढत्या विकासासोबतच सुरक्षा या डिजिटल जगतातील अत्यंत महत्त्वाच्या विषयालाही तोंड फुटले. गोपनीय सरकारी माहितीपासून तुमचे वैयक्तिक यूजरनेम आणि पासवर्डपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यांचे संरक्षण हॅकर्स आणि ऑनलाइन घोटाळ्यांपासून केले पाहिजे. मेट्रिक सिस्टिम आणि इतर विशेष तंत्रज्ञानाचा विकास डिजिटल सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी केला जात आहे. नवीन बिझनेस मॉडेल्सबाबत विचार करणे आकर्षक असताना हे तंत्रज्ञान ते शक्य करून दाखवते आणि अनेक ट्रिलियन डॉलर्सच्या संधी मिळतात आणि त्याचवेळी खूप मोठे धोकेही संभवतात.
स्मार्टफोन वापर आणि फोरजी तंत्रज्ञानाचा अंगीकार वाढवण्याबरोबरच मोठय़ा प्रमाणावर वितरण, वाढता वापर आणि सातत्यपूर्ण नवसंशोधन आणि त्याचवेळी प्रवेशातील कमी अडथळे हे मोबाईल व्हीडिओला चालना देत आहेत. मोबाईल व्हीडिओने मोबाईलच्या सर्व माहितीची दोन तृतीयांश जागा व्यापली असून त्याचबरोबर ऑनलाइन जाहिरातींच्या खर्चाच्या अध्र्याहून अधिक खर्च केला जातो. त्यामुळे जाहिरातदारांसाठी ही एक अत्यंत मौल्यवान गुंतवणूक आहे. भारत ही एक वेगाने बदलती बाजारपेठ असून ती चीननंतर दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाईल फोन बाजारपेठ ठरली आहे. विकसित देशांमध्ये स्मार्टफोनच्या वापरात स्थैर्य आले आहे आणि त्यामुळे आता विकसनशील देशांवर लक्ष केंद्रित करायचे आहे जे वाढत राहणार आहे.