जयप्रकाश नारायण हे ‘लोकनायक’ म्हणूनही ओळखले जात असत. ११ ऑक्टोबर, १९०२ रोजी बिहार राज्यात त्यांचा जन्म झाला.
जयप्रकाश नारायण हे ‘लोकनायक’ म्हणूनही ओळखले जात असत. ११ ऑक्टोबर, १९०२ रोजी बिहार राज्यात त्यांचा जन्म झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि राजकीय नेते होते. १९७०च्या दशकात त्यांनी भारतातील समाजकारण व राजकारण ढवळून काढलं होतं.
त्यांनी ‘स्वदेशी’चा स्वीकार केला होता. अमेरिकेत त्यांचा ‘मार्क्सवादी’ विचारांशी परिचय झाला. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावती देवी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्याही एक स्वातंत्र्यसेनानीच होत्या. ‘जयप्रकाश’ या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
त्यांच्या उल्लेखनिय सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९९ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला. याशिवाय १९६५ सालचा मॅगसेसे पुरस्कारही त्यांच्या नावे जमा आहे. ८ ऑक्टोबर, १९७९ रोजी त्यांचं निधन झालं.