मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता एमएमआरडीएच्या माध्यमातून काशिमिरा नाक्यापासून थेट जुन्या भाईंदर फाटकावरून पश्चिमेला फ्री-वे बांधण्याची मागणी होत आहे.
भाईंदर – मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता एमएमआरडीएच्या माध्यमातून काशिमिरा नाक्यापासून थेट जुन्या भाईंदर फाटकावरून पश्चिमेला फ्री-वे बांधण्याची मागणी होत आहे. या मागणीमुळे सध्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रमुख जंक्शनवर सहा छोटे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थगित केला आहे.
मुंबई-ठाण्यासह महामार्गास जोडणा-या शहराच्या या प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दीपक रुग्णालय चौक, शिवार उद्यान-कनकिया चौक, श्रीकांत जिचकर चौक, सिल्वर पार्क व प्लेझेंट पार्क अशा एकूण सहा ठिकाणी छोटे उड्डाण पूल तसेच सावरकर चौक व काशिमिरा नाका येथे पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला होता.
प्रशासनाने याकामी सुमारे ४० कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. सावरकर चौक येथील पादचारी पुलाची निविदाही काढली. तर सहा छोटे उड्डाणपूल व काशिमिरा पादचारी पुलाची निविदा काढण्याची कार्यवाही सुरू होती, मात्र या मार्गावर फ्री-वे बांधण्याची मागणी होत असून, यासाठी सुमारे १८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून हा मार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे. या मागणीमुळे सध्या पालिकेने छोटे उड्डाणपूल व पादचारी पूल बांधण्यासाठीच्या निविदा काढण्याची कार्यवाही स्थगित केल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली.
सव्र्हिस रोड कधी होणार ?
काशिमिरा नाक्यापासून भाईंदर फाटकापर्यंतचा रस्ता ४५ मीटर रुंदीचा विकसित करण्यासह सव्र्हिस रोडचा समावेश आराखडय़ात होता, मात्र सव्र्हिस रोडबाधित बांधकामांना पाठीशी घालत सव्र्हिस रोडच गुंडाळून ठेवला. काशिमिरा नाका येथे तर रस्ता अद्याप ४५ मीटर रुंदीचा झालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेनंतरही पालिकेने सव्र्हिस रोड विकसित केलेला नाही. सव्र्हिस रोडसाठी उपलब्ध जागासुद्धा ताब्यात घेण्यास पालिका इच्छुक नाही.
नागरिकांना काय हवे?
फ्री-वे होईल तेव्हा होईल. आधी सव्र्हिस रोड बनवा, रस्ता-फूटपाथवरील बेकायदा अतिक्रमण व पाìकग हटवा, प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलिस नेमून सिग्नल पालनाची काटेकोर अमलबजावणी करा. जेणेकरून वाहतूक कोंडीतून सुटका होईल व बेशिस्त वाहनचालकांना आळा बसेल, अशा माफक मागण्या नागरिक व वाहनचालकांच्या आहेत.