मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते.
ठाणे– ठाण्यातील खारेगाव टोलनाका राज्यातील बंद होणारा पहिला टोलनाका ठरला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद झाला. यावेळी वाहनचालकांनी जल्लोषात हा क्षण साजरा केला.
मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे. तसेच प्रवाशांचा रांगेमध्ये वाया जाणारा वेळही आता वाचणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याची उभारणी आणि त्याच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय आयआरबीने घेतला आहे. १९९८ साली हा टोलनाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चाचे १८० कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते. प्रत्यक्षात कंपनीने यापेक्षा कितीतरी जास्त पटीने वसुली केल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी टोलनाका बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.