मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातला दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी कंबर कसली आहे. असा दुष्काळ हटवण्याची ताकद असलेल्या शिरपूर बंधा-यांमध्ये त्यांनी खूपच रस घेतला आणि कमीत कमी खर्चात राज्यामध्ये अनेक बंधारे उभे करण्याची मोहीम राबवली. २०१२-२०१३ हे वर्ष राज्याला फारच तापदायक गेले. त्या वर्षातील दुष्काळाच्या झळा जसजशा जाणवायला लागल्या तशा एकेक समस्या आणि त्यावरचे उपाय समोर यायला लागले. म्हणजे थोडेसे उशिरानेच शिरपूर बंधा-याची कल्पना मुख्यमंत्र्यांना जाणवली. त्यामुळे त्यादृष्टीने फारसे काम होऊ शकले नाही. अर्थात अजूनही ते करण्यास बरीच संधी आहे. आपल्याकडे दुष्काळाचे वर्ष संपले आणि थोडाबहुत पाऊस पडला की, दुष्काळ निवारणाच्या योजना थंड पडतात. या वर्षी तर चांगलाच पाऊस पडला आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणाच्या योजनाच काय पण चर्चासुद्धा थांबण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी पुढाकार घेऊन विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘पाणी समस्या आणि व्यवस्थापन’ या विषयावर तज्ज्ञांचा परिसंवाद आयोजित केला. त्यात मुख्यमंत्री स्वत: सहभागी झाले होते. पाण्याच्या समस्येवर केलेल्या कामाबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले ‘जोहडबाबा’ राजेंद्र सिंह यांनाही सन्मानाने पाहुणे म्हणून बोलावलेले होते. या वर्षी शिरपूर पद्धतीच्या बंधा-यांकडे सर्वाचे लक्ष गेले. तसेच या पद्धतीमुळे दुष्काळातही धुळे आणि शिरपूर तालुक्यातील ३५ गावांना उपलब्ध झाले. हे बंधारे राबवून यशस्वी करणारे आमदार अमरीशभाई पटेल आणि त्यांचे सहकारी जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर हेही या परिसंवादात सहभागी झाले होते. त्यांनी अतिशय मार्गदर्शक विचार मांडले. गेल्या वर्षी राज्यामध्ये दीड हजार साखळी बंधारे बांधण्यात आले असल्यामुळे आठ टीएमसी पाणी आजपर्यंत झिरपवले गेले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राजेंद्र सिंह यांनीही अतिशय उपयुक्त सूचना केल्या. बंधा-यांच्या बांधकामांमध्ये अभियंत्याने भ्रष्टाचार केला आणि कंत्राटदारही त्यात सहभागी असेल तर हे बंधारे लवकरच कुचकामी ठरतील, असा इशारा त्यांनी दिला. यावर उपाय म्हणून राजेंद्र सिंह यांनी अशा बंधा-यांच्या बांधकामांमध्ये जनसहभाग आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानात जी जलक्रांती केली आहे ती लोकांच्या पाठिंब्यावरच त्यांनी घडवली. महाराष्ट्रातील जलक्रांती ही राहू द्या. पण निदान राज्यासाठी वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध होणे, त्यासाठी सरकारने, लोकांनी तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारसह लोकांनीही पुढाकार घ्यावा. पाण्याच्या टंचाईचे निवारण करणे, हे काही फक्त राजकारण्यांचे काम नाही. ती लोकांचीसुद्धा जबाबदारी आहे. पण आपल्याकडे उलटा प्रकार होतो. सरकार फक्त पैसा ओतत बसते आणि कामाच्या दर्जावर समाजाचे कसलेही नियंत्रण नसते, अंकुशही नसतो. पाणी असताना त्यांचा बेसुमार उपसा करायचा आणि पाणीटंचाई आली की, सरकारवर टीका करत बसायचे. स्वत: मात्र कोणत्याही कार्यात सहभाग घ्यायचा नाही, ही सर्वसामान्यांची प्रवृत्ती आता बदलायला हवी. पाणी नियोजनाचा विचार सरकारसह लोकांच्या मेंदूतही कायमस्वरूपी झिरपला पाहिजे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on