रक्षाबंधन पौर्णिमेचा सण या वर्षी २६ ऑगस्ट रोजी येत आहे. या वर्षी सर्वात चांगली बाब म्हणजे राखीच्या दिवशी भद्रा नाही आहे, म्हणून रक्षाबंधन सकाळपासून रात्रीपर्यंत साजरा करण्यात येईल, पण मधला काही वेळ सोडावा लागणार आहे, कारण अशुभ चौघडिया, राहू काल, यम घंटा आणि गुली काल राहणार आहे.
ज्योतिष पंचांगानुसार पौर्णिमा तिथी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपासून १६ मिनिटाने सुरू होईल जे २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटापर्यंत राहणार आहे. या दिवशी धनिष्ठा नक्षत्र दुपारी १२.३५ पर्यंत राहणार आहे.
रक्षाबंधनचा मुहूर्त २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४३ पासून दुपारी १२.२८ वाजेपर्यंत राहणार आहे. यानंतर दुपारी २.०३ ते ३.३८ पर्यंत राहणार आहे. संध्याकाळी ५.२५ला पौर्णिमा तिथी समाप्त होईल, पण सूर्योदय व्यापिनी तिथी असल्याने रात्रीदेखील राखी बांधता येईल.
>> धनिष्ठा पंचकाची बाधा नाही आहे
धनिष्ठा ते रेवतीपर्यंत पाच नक्षत्रांना पंचक म्हटले जाते. हे पंचक पाच दिवसांपर्यंत चालते. पंचकाबद्दल असे भ्रम आहेत की, यात कुठलेही कार्य करू शकत नाही. जेव्हा की सत्यता अशी आहे की, पंचकात अशुभ कार्य नाही करायला पाहिजे, कारण त्यांची पाचवेळा पुनरावृत्ती होते. पंचकात शुभ कार्य करण्यात अडचण नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असल्याने पंचक राहणार आहे, पण राखी बांधण्यास हे बाधक नाही आहे. भाऊ आणि बहिणीसाठी रक्षाबंधन (२६ ऑगस्ट, रविवार) एक महापर्वाप्रमाणे असतो. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. राखी बांधण्याअगोदर एक विशेष थाळी सजवली जाते. या ताटात कोणकोणत्या ७ खास वस्तू असायला पाहिजेत, येथे जाणून घ्या..
>> कुंकू
कुठल्याही शुभ कामाची सुरुवात कुंकूपासून सुरू होते. ही प्रथा फार जुनी आहे आणि याचे पालन आजही करण्यात येत आहे. तिलक मान-सन्मानाचा प्रतीक आहे. बहीण तिलक लावून भावाप्रती आदर दाखवते. तसेच, आपल्या भावाच्या कपाळावर तिलक लावून
बहीण त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. म्हणून पूजेच्या ताटात कुंकू ठेवणे आवश्यक आहे.
>> तांदूळ (अक्षता)
तिलक लावण्यानंतर त्यावर अक्षता लावल्या जातात. तांदळाला अक्षता म्हटले जाते. तिलकावर अक्षता लावण्याचा अर्थ असा आहे की, भावाच्या जीवनावर तिलकाचा शुभ प्रभाव बनून राहायला पाहिजे. तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे जीवनात भौतिक सुख-सुविधांची प्राप्ती होते.
>> नारळ
आपल्या भावाला बहीण तिलक लावल्यानंतर हातात नारळ देते. नारळाला श्रीफलही म्हणतात. श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. बहीण भावाला नारळ देऊन ही कामना करते की, भावाच्या जीवनात सुख आणि समृद्धी नेहमी टिकून राहावी आणि त्याची प्रगती व्हावी.
>> रक्षा सूत्र (राखी)
रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. आमच्या शरीरात कुठलेही आजार या तीन दोषांमुळे होतात. रक्षा सूत्र मनगटावर बांधल्याने शरीरात या तिघांचे संतुलन बनून राहते. हे दोरे बांधल्याने मनगटाच्या नसांवर दाब पडतो, ज्याने तिन्ही दोष नियंत्रणात राहतात. रक्षा सूत्राचा अर्थ आहे, तो सूत्र (दोरा) जो आमच्या शरीराची रक्षा करतो. राखी बांधण्याचा एक मनोवैज्ञानिक पक्ष देखील आहे. बहीण राखी बांधून आपल्या भावाकडून जन्मभर रक्षा करण्याचे वचन घेते. भावाला देखील हे रक्षा सूत्र या गोष्टीची जाणीव करून देते की, त्याला नेहमी बहिणीची रक्षा करायची आहे.
>> मिठाई
राखी बांधल्यानंतर बहीण आपल्या भावाला मिठाई खाऊ घालून त्याचे तोंड गोड करते. मिठाई खाऊ घालणे या गोष्टीचे प्रतीक आहे की बहीण आणि भावाच्या नात्यात कधीही दुरावा निर्माण न व्हावा, मिठाईप्रमाणे नेहमी त्यांच्या जीवनात गोडवा राहावा.
>> दिवा
राखी बांधल्यानंतर बहीण दिवा लावून भावाला आरती ओवाळते. या नात्यात अशी मान्यता आहे की, आरती ओवाळताना सर्व प्रकारच्या वाईट दृष्टींपासून भावाची रक्षा होते. आरती ओवाळून बहीण कामना करते की, भाऊ नेहमी स्वस्थ आणि सुखी राहावा.
>> पाण्याने भरलेला कलश
राखीच्या थाळीत पाण्याने भरलेला एक कलश देखील ठेवण्यात येतो. कलशातील पाणी घेऊन कुंकू मिसळून तिलक तयार केले जाते. प्रत्येक शुभ कामाच्या सुरुवातीत पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो. अशी मान्यता आहे की, या कलशामध्ये सर्व पवित्र तीर्थ आणि देवी देवतांचा वास असतो. या कलशाच्या प्रभावामुळे भाऊ आणि बहिणीच्या जीवनात सुख आणि प्रेम सदैव कायम राहते.
हे आहेत शुभ मुहूर्त
प्रात : ७.४३ ते ९.१८ पर्यंत चर.
प्रात : ९.१८ ते १०.५३ पर्यंत लाभ.
प्रात : १०.५३ ते १२.२८ पर्यंत अमृत.
दुपारी : २.०३ ते ३.३८ पर्यंत शुभ.
सायं : ६.४८ ते ८.१३ पर्यंत शुभ.
रात्री : ८.१३ ते ९.३८ पर्यंत अमृत.
रात्री : ९.३८ ते ११.०३ पर्यंत चर.
या वेळेस राखी बांधणे टाळायला पाहिजे, अशुभ आहे ही वेळ
राहू काल प्रात : ५.१३ ते ६.४८.
यम घंटा दुपारी : १२.२८ ते २.०३.
गुली काल दुपारी : ३.३८ ते ५.१३.
काल चौघडिया दुपारी. १२.२८ ते २.०३