रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील विदर्भा विरुध्दच्या सामन्यात इशांत शर्माने भेदक गोलंदाजी केली.
नवी दिल्ली – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील विदर्भा विरुध्दच्या सामन्यात इशांत शर्माने भेदक गोलंदाजी केली. अवघ्या २६ धावा देत इशांतने विदर्भाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.
पहिल्या दिवसअखेर दिल्लीने विदर्भाला सहाबाद २२२ धावांवर रोखले. फिरोझ शहा कोटलाच्या घराच्या मैदानावर खेळण्याचा इशांतने पुरेपूर फायदा उचलला.
दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चार छोटया स्पेलमध्ये गोलंदाजी करताना इशांतने तीन गडी बाद केले. विदर्भाकडून फैझ फझलने (५५) आणि सुब्रमण्यम बद्रीनाथने (४४) तिस-या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली.
दोन बाद १६ अशा अडचणीच्या स्थितीत असताना त्यांनी विदर्भाचा डाव सावरला. यंदाच्या मोसमात मुंबईऐवजी विदर्भाकडून खेळणारा सलामीवीर वसिम जाफर एकही चेंडू न खेळता (०) वर धावबाद झाला.
आदित्य शानवारे (४१) आणि जितेश शर्मा (३५) नाबाद यांच्यात सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची दुसरी महत्वाची भागीदारी झाली. एसबी वाघ आणि जितेश शर्मा ही जोडी मैदानावर आहे.