गेल्या एक दोन वर्षात निवृत्तीच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाला आहे. निवृत्तीनंतर आयुष्य म्हणजे अनेकांसाठी आयुष्यातील एक नवे पर्व असते, ज्यात त्यांना त्यांच्या आवडीचे काम करता येते आणि छंदांना व्यवसायाचे स्वरूप देता येते. भारतात ४० ते ५०व्या वर्षीच निवृत्त होऊन ८०-८५ वष्रे जगणा-या व्यक्तींच्या संख्येत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर सुखी आयुष्य जगण्यासाठी निवृत्ती नियोजन करणे तितकेच गरजेचे झाले आहे.
शहरी भारतातील आर्थिक नियोजनाची सद्य:परिस्थिती काय आहे, हे समजून घेण्याकरिता ११ प्रमुख शहरांमध्ये एचडीएफसी लाइफ व्हॅल्यू नोट्स लाइफ फ्रीडम इंडेक्स या सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, संपूर्ण आयुष्यातील राहणीमानविषयक मानकांची पूर्तता करण्याकरिता त्यांचे आíथक नियोजन पुरे पडू शकेल का याबद्दल अनेक जण साशंक असतात. फक्त १३ टक्के तरुण आणि स्त्रिया यांना असे वाटते की, त्यांचे आíथक नियोजन त्यांना आयुष्यभर पुरे ठरू शकेल. आत्मविश्वासाच्या पातळीत समंजस गुंतवणूकदारांना (४५ वष्रे व त्यापुढील) उच्च गुण मिळाले असले तरी या गुंतवणूकदारांची संख्या मात्र २४ टक्के आहे.
इतर उद्दिष्टांप्रमाणे निवृत्तीकरिता
नियोजन का करावे?
आयुष्यमानात झालेली वाढ : वैद्यकीय आणि हेल्थकेअर सेवेचा दर्जा सुधारल्यामुळे सध्याच्या पिढीचे सरासरी आयुष्यमान मागील पिढीपेक्षा वाढले आहे. याचाच अर्थ असा की, तेवढे आयुष्य जगण्याकरिता तेवढा निधी असणे गरजेचे आहे. याचाच अर्थ असाही आहे की, आपल्याला हेल्थकेअरविषयक गरजा आणि खर्च यांबद्दलच्या समस्या भेडसावणार आहेत.
कंपनीकडून मिळणारे अपुरे निवृत्ती वेतन/निवृत्ती वेतन निधी : नोकरीत असताना कंपनीच्या मालकाने किंवा सरकारने पुरवलेल्या निवृत्तीवेतन योजनांतून मिळणारी रक्कम निवृत्तीनंतरच्या गरजांची पूर्तता करणारी ठरू शकेल असे नाही. या योजनांतून मिळणारे निवृत्तीवेतन राहणीमानाशी संबंधित गरजा पूर्ण करतील असे नाही. जगभरातील अनेक व्यक्ती सरकार किंवा कंपनीने देऊ केलेल्या निवृत्तीशी संबंधित योजनांच्या जोडीने स्वनिधी म्हणजेच निवृत्तीवेतन योजनांचा पर्याय निवडतात.
सामाजिक रचनेतील बदल : कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असूनही अनेक निवृत्त व्यक्ती निवृत्तीपश्चात आपल्या गरजा भागवण्याकरिता आपले नातेवाईक किंवा मुलांवर अवलंबून राहणे पसंत करत नाहीत. मात्र पुरेसे आर्थिक पाठबळ असेल तरच स्वतंत्र राहणीमान परवडणे शक्य होते.
सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा अभाव : आपल्या देशात सामाजिक सुरक्षा व्यवस्थाच जवळजवळ नाहीच आहे. त्यामुळे नियमित उत्पन्नाचा तुटवडा भरून काढण्याकरिता आणि निवृत्तिपश्चात कोणत्याही कारणाकरिता निधी हवा असल्यास त्याची तरतूद स्वत:लाच करावी लागते.
आपले योगदान सुरूच ठेवण्याची इच्छा : अनेकांना निवृत्तीनंतरही आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांमध्ये आर्थिक सहाय्य पुरवून आपले कुटुंबाप्रति योगदान सुरूच ठेवण्याची इच्छा असते. आपले स्वत:चे स्वतंत्र काम सुरू करण्याचे प्रमाणही वाढले आहे. पण हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्टया स्वावलंबी आहात.
आराम आणि निवांतपणा : आपल्या जबाबदा-या यशस्वीरीत्या पार पाडल्यावर सुट्टीवर जाण्याकरिता, छंद जोपासण्याकरिता निधी असणे गरजेचे आहे.
गुंतवणूक करणे गरजेचे
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कशी आणि कशात गुंतवणूक करावी. तुम्ही ज्या उत्पादनांत गुंतवणूक करू इच्छिता ते अनेक कारणांवर अवलंबून असेल जसे की- तुमची धोका पत्करण्याची इच्छा, गुंतवणुकीचा कालावधी. या दोन घटकांचा एकत्रच विचार करावा लागतो. निवृत्त होण्याकरिता जेवढी वष्रे उरली आहेत त्यावर तुम्ही किती धोका पत्कारणार हे ठरले जाते.
जर तुम्ही उशिरा म्हणजे वयाच्या ४५ वर्षानंतर निवृत्त होत आहात तर तुम्ही तुमची नियमित तत्त्वावरील बचत सरकारी सिक्युरीटीजमध्ये गुंतवू शकता आणि शेअरमधील गुंतवणूक मर्यादित ठेवू शकता.
जर तुम्ही गुंतवणुकीस लवकर सुरुवात केलीत (वयाच्या ३० व्या वर्षी) आणि निवृत्त होताना निवृत्तीवेतनाची भरघोस रक्कम तुमच्या हातात पडावी अशी तुमची इच्छा असेल तर थोडासा धोका पत्करून तुम्ही सर्वाधिक परतावा देणा-या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. मात्र एकाच ठिकाणी सर्वच्या सर्व गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
तुमच्या निवृत्तीची वेळ जवळ येत चालली की तुमची धोके पत्करण्याची क्षमता कमी होते आणि तुमची गुंतवणूक जास्तीत-जास्त सुरक्षित कशी राखता येईल याचा विचार करावा लागतो. तुम्ही निवृत्तीच्या वयात पोहोचलात की तुम्ही तुमचा निधी उत्पन्न देणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवला पाहिजे.
निवृत्ती वेतन आणि वार्षकी
निवृत्तीनंतरच्या गरजा भागवण्याकरिता विमा कंपन्यांनी देऊ केलेले निवृत्तीवेतन आणि वार्षिकीबद्दलच्या योजना हा गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतात. निवृत्तीवेतनविषयक योजनांमधून उत्तम निधीची उभारणी करता येते. विमा उतरवणा-या माणसाचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना लाभ मिळू शकतात. इतर विमा योजनांपेक्षा ही योजना वगेळी असल्याचे कारण म्हणजे नियमित तत्त्वावर उत्पन्न मिळत राहावे म्हणून गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर एकूण निधीपैकी दोन तृतीयांश रक्कम पुन्हा गुंतवली जाते, ज्याला वार्षकिी असे म्हणतात. उर्वरित एक तृतीयांश रक्कम कोणताही कर भरावा न लागता गुंतवणूकदारास ठोक रीतीने दिली जाते. वार्षकी हे उत्पन्न देणारे विमा उत्पादन आहे आणि निवृत्तीनंतर नियमित तत्त्वावर उत्पन्न मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार या पर्यायाला पसंती देतात.
तुम्ही वार्षकी मध्ये गुंतवणूक केलीत की ती तुम्हाला ठरावीक कालावधीनंतर काही ठरावीक रक्कम देत राहते. वार्षिकीतून मासिक, त्रमासिक, वार्षकि किंवा वार्षकि तत्त्वावर रक्कम मिळू शकते किंवा ठोक रक्कम मिळण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला आयुष्यभर काही ठरावीक रक्कम मिळत राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे किंवा तुम्ही काही वष्रे निश्चित करू शकता. तुम्ही तुमची गुंतवलेली रक्कम परत मिळवू शकता किंवा प्रत्येक वर्षी तुमची वार्षकी वाढवू शकता. तुमच्या पश्चात तुमच्या पत्नीला नियमित तत्त्वावर रक्कम मिळत राहावी म्हणून तुम्ही तरतूद करू शकता. वार्षकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्या/तिच्या गरजेनुसार व्यक्ती आपल्या पर्यायांची निवड करू शकता. तुम्हाला तुमच्या निवृत्तीवेतनविषयक योजना आखण्यात मदत करणारी अनेक ऑनलाइन टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या योजनेबद्दल एखाद्या आर्थिक सल्लागाराकडून तज्ज्ञ मत मिळवणे हितकारक असेल. कारण, तुम्ही कधी निवृत्त होता हे महत्त्वाचे नाही तर कुठल्या राहणीमानातून आणि उत्पन्नातून निवृत्त होत आहात, हे महत्त्वाचे आहे.
निवृत्ती योजनेतील महत्त्वाचे घटक
>निवृत्तीनंतर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला किती रकमेची गरज आहे ते ठरवा. महागाई आणि खर्च हे घटक ध्यानात ठेवा.
>निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहेत याचे मोजमाप करा. जेवढा जास्त काळ गुंतवणूक कराल, परतावा तेवढाच अधिक मिळेल हे नेहमी ध्यानात ठेवा.
>तुमच्या कंपनीच्या निवृत्ती वेतन योजनेची माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त निधीचे नियोजन करता येईल.
>तुमची धोका पत्करण्याची इच्छा आणि परताव्याबद्दलच्या अपेक्षा यांच्याशी मिळत्याजुळत्या गुंतवणूक योजनांची निवड करा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम गुंतवणूक योजनांची माहिती मिळवा.
>निवृत्तीपर्यंत तुमच्या योजनेचा नियमित तत्वावर, किमान एका वर्षाने आढावा घ्या.
– संजय त्रिपाठी, कार्यकारी उपाध्यक्ष, एचडीएफसी लाइफ