येत्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीत मोदी हरणार आणि आपणच प्रचंड मताधिक्यांनी जिंकून येणार असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अऱविंद केजरीवाल यांनी केला आहे.
वाराणसी – येत्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीत मोदी हरणार आणि आपणच प्रचंड मताधिक्यांनी जिंकून येणार असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अऱविंद केजरीवाल यांनी केला आहे.
वाराणसीमधून निवडणूक लढवत असलेल्या मोदींनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रोड शो केला. त्यानंतर आज(शुक्रवारी) केजरीवाल यांचा रोड शो होत आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
यावेळी त्यांनी हेलिकॉप्टर राजकारणावरुनही मोदींवर टीका केली. मोदी वारणसीत केवळ दोन तास होते. ते हेलिकॉप्टरने आले आणि निघूनही गेले. अशी व्यक्ती देशाचा विकास कसा काय करु शकते. असे म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. ही ऐतिहासिक निवडणूक आहे काशीमधील लोकांना ठरवायचे आहे ते भ्रष्ट राजकारण करण्या-या मोदींना मत द्यायचे की आम्हाला मत द्यायचे असेही केजरीवाल म्हणाले.
वाराणसीमधून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधात आपचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहेत. येत्या १२ मे ला शेवटच्या टप्प्यात या भागात मतदान होणार आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधात आपचे अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत.