कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये जलद पंधरा शतके झळकवणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
हरारे – भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख आधारस्तंभ बनलेला कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये जलद पंधरा शतके झळकवणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
कोहलीने पंधरा शतके झळकवण्यासाठी १०९ सामने घेतले. कोहली पाठोपाठ सईद अन्वरचा नंबर लागतो. अन्वरने १४३ सामन्यांमध्ये पंधरा शतके झळकवली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने १४४ सामन्यांमध्ये पंधरा शतके झळकवली. सध्याचा वेस्टइंडिजचा धडाकेबाज आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला पंधरा शतकांसाठी १४७ सामने लागले. तर दक्षिणअफ्रिकेचा हर्शेल गिब्ज सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्याने १६१ सामन्यांमध्ये पंधरा शतके झळकवली.
विराट कोहली सध्या झिम्बाब्वे दौ-यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची विक्रमादित्य सचिन तेंडुलकरबरोबर तुलना केली जात आहे. विराट कोहलीची गुणवत्ता लक्षात घेता भारतीय क्रिकेट आणि चाहत्यांना कोहलीकडून भरपूर अपेक्षा आहेत.