Saturday, June 1, 2024
Google search engine
HomeUncategorizedशेतीला आधुनिक उपकरणांची जोड

शेतीला आधुनिक उपकरणांची जोड

शेतीव्यवसायातील इतर कामे वेगाने करण्यासाठी आधुनिक यंत्रांची गरज आहे. यामुळे अनावश्यक श्रम वाचून पैशाचीही मोठी बचत होईल. नारळ सोलणी, भात मळणी, काजू बी फोडणी, सुपारी सोलणी यंत्र, हायड्रोलिक लॅडर आणि कोनोविडर या उपकरणांची उपयोगिता आणि महत्त्व यांचा घेतलेला हा आढावा.

coconut copyनारळ सोलणी यंत्र :

सुकलेल्या नारळाचे सोडण काढणीचे काम जिकिरीचे आहे. नारळ सोलण्याकरिता वजनास हलके असे यंत्र उपलब्ध आहे. नारळाचे सोडण या एकत्र असलेल्या पात्यांवर हाताच्या जोराने घुसवावे लागते. नंतर हँडल वर उचलल्यावर सोडण नारळापासून वेगळा होतो.

यंत्राला खाली फ्रेम दिली असून नारळ सोलणारा मनुष्य फ्रेमवर पाय घट्ट ठेवून फ्रेम जमिनीवर धरून ठेवू शकतो. हे नारळ सोलणी यंत्र नारळ सोलण्यास अत्यंत कार्यक्षम असून हाताच्या साहाय्याने चालत असल्यामुळे वापराचा खर्च कमी येतो. या यंत्राची किंमत २४५ रुपये एवढी आहे.

भात मळणी यंत्र :

उपलब्ध उच्च क्षमतेची मळणी यंत्रे वापरताना भाताचा अखंड पेंढा मिळत नाही. पेंढयाचे तुकडे होतात.

आपल्या भागात भाताच्या अखंड पेंढयाला खूप महत्त्व असल्याने उच्च क्षमतेच्या मळणीयंत्राच्या वापरावर मर्यादा येतात. याशिवाय त्यांची किंमत पण जास्त आहे.

कमी किमतीच्या पायाने चालणा-या भात मळणी यंत्राचा पावर काही ठिकाणी करण्यात येतो. पण हल्ली मजुरीचे वाढलेले दर, मजुरांची शेती कामाला उपलब्धता व त्यांची क्षमता लक्षात घेता मजुरांकडून मळणी व झोडणीचे कामासाठी खूप वेळ लागतो व खर्चही जास्त येतो. त्यामुळे मळणीसाठी यांत्रिकी पद्धतीचा वापर करणे अपरिहार्य आहे.

भात मळणी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले विद्युत मोटारचलित भात मळणी यंत्राचा वापर केल्यास स्वच्छ धान्यासोबतचा भाताचा अखंड पेंढा मिळतो. इनव्हरटेड चेन प्रकारचा कनव्हेअर असलेले मळणीयंत्र वापरल्यास भाताची मळणी होऊन ताशी २०० किलोपर्यंत स्वच्छ धान्य आपणाला मिळते. या मळणी यंत्रामध्ये सिंगल फेजवर चालणारी २ अश्वशक्तीची विद्युत मोटार दिलेली असून अत्यंत जलद मळणी करता येते.

सदर यंत्राचा वापर केल्यास मजुरांकडून झोडणी व मळणी करण्याचे कष्टप्रदकाम टाळता येते व भात मळणी कमी वेळेत व कमी खर्चात होते. पायाने चालणा-या मळणी यंत्रापेक्षा अत्यंत कार्यक्षम असून उफणणी करावी लागत नाही. मळणीला खर्च कमी येतो.

भाताचा अख्खा पेंढा मिळतो. मळणी करताना ड्रममध्ये कापलेले पीक धरून ठेवावे लागत नाही. फलाटावरून पीक स्वयंचलितरीत्या आपोआप पुढे सरकावले जाते. मळणीची क्षमता ९७ ते ९८ टक्के असून बी स्वच्छ करण्याची क्षमता ९८-९९ टक्के आहे. या यंत्राची क्षमता १९०-२०० किलो प्रति तास आहे. भात मळणी यंत्राची किंमत ३६,००० रुपये आहे.

निमस्वयंचलित काजू बी फोडणे यंत्र : काजूगर काढण्याकरिता काजू बी फोडणीचे काम जिकिरीचे आणि जोखमीचे आहे. काजू बीच्या टरफलातील तेलामुळे बी फोडणा-या हाताला इजा होते. डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे निमस्वयंचलित काजू बी फोडणी यंत्र विकसित करण्यात आले आहे. सदर यंत्र १/४ अश्वशक्ती मोटरवर चालत असून काजू बी फोडण्याचा पात्यापर्यंत सरकावण्यासाठी फिडिंग चॅनल दिला असून यंत्राच्या चिमटयाच्या साहाय्याने काजू बी फोडणी यंत्रणेपर्यंत पोहोचवली जाते.

ब्लेडपर्यंत काजू बी पोहोचवून ती फोडली जाते. या यंत्राला विविध ग्रेडची काजू बी फोडण्याकरिता यंत्रणेत बदल करण्याची सोय आहे. एकावेळी एकाच ग्रेडचे काजू बी व्यवस्थितरित्या फोडता येतात. या यंत्राद्वारे काजू बी वाफवून एक दिवस कंडिशनिंग करणे आवश्यक आहे.

यंत्राला चालवण्यासाठी एका मजुराची आवश्यकता असून काजू टरफलातील तेल हाताला लागत नाही. या यंत्राची ताशी बी फोडण्याची क्षमता १० किलो असून फोडणीची कार्यक्षमता ८८.४८ टक्के एवढी आहे. सदर यंत्राचा वापर करून ८३ टक्के अख्खे काजूगर मिळतात. अध्रे गर व फुटीचे प्रमाण मनुष्यचलित काजू बी फोडणी यंत्राइतकेच आहे. या यंत्राची किंमत ३५,००० रुपये असून काजू बी फोडणीसाठी उपयुक्त आहे.

हाताने चालणारे कोकण सुपारी सोलणी यंत्र : महाराष्ट्रातील कोकण विभागात सुपारीच्या झाडांची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते. कोकणातील सुपारी बागायतदारांना सुपारी सोलण्याकरिता कु शल महिला मजुरांची गरज प्रामुख्याने भासते. वेळेवर मजूर उपलब्ध न झाल्यामुळे सुपारी सोलण्याच्या कामाला उशीर लागतो. याशिवाय सुपारी सोलताना मजुरांच्या हातालादेखील इजा होते. सुपारी सोलण्याचे काम हे कष्टप्रद असून या कामाकरिता मजुरांची कमतरता प्रामुख्याने जाणवते.

या सर्व बाबींचा विचार करून हाताने चालवले जाणारे सुपारी सोलणी यंत्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या यंत्रामध्ये स्क्रू आणि सिलेंडरची यंत्रणा असून त्यामध्ये ब्लेड्स बसवले आहेत. यंत्रातील स्क्रू ला हाताने फिरवायचा दांडा बसवला असून त्या दांडयाच्या मदतीने सुपारी सोलून बाहेर येते.

६ ते ८ टक्के आद्र्रता असलेल्या सुपारीला या यंत्राद्वारे सोलण्याची क्षमता ४ ते ६ किलो प्रति तास असून या यंत्रामधून सुपारी फुटीचे प्रमाण सरासरी १० ते १४ टक्के आणि ओलसर सुपारी न सोलता बाहेर पडण्याचे प्रमाण ४ ते ६ टक्के आढळून आले.

प्रतवारी केलेल्या सुपारी सोलणीसाठी यंत्राची कार्यक्षमता ८० ते ८५ टक्के आहे. हे यंत्र चालवण्याकरिता अतिशय सोपे व सहज आहे. यंत्र छोटे असल्याकारणाने हवे त्या ठिकाणी यंत्राची ने-आण करता येते. हे यंत्र सुपारी बागायतदारांकरिता उपयुक्त असून यंत्राची किंमतदेखील सर्वसाधारण सुपारी उत्पादकदारांना परवडण्यासारखी आहे.

ट्रॅक्टरचलित हायड्रॉलिक लॅडर :

दिवसेंदिवस मजुरांची टंचाई व वाढलेला मजुरी खर्च लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ट्रॅक्टरचलित हायड्रॉलिक लॅडर विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र ट्रॅक्टर पी.टी.ओ.वर चालत असून हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे बकेटची उंची कमी-जास्त करता येते. बकेटला ३६० अंश कोनात फिरवता येते. या यंत्राच्या बकेटमध्ये उभा असलेला मनुष्य बकेटमधील बटणाद्वारे उंची नियंत्रित करू शकते.

यंत्र चार झाडांच्या मधोमध उभे करून एका ठिकाणावरून चार झाडांपर्यंत बकेट पोहोचू शकते. फळबागेतील झाडांच्या फांद्या तोडणे, उंच झाडांची जवळून फवारणी करणे, फळ काढणी, बागेची सफाई व तत्सम झाडांच्या उंचीवरील कामे या यंत्राच्या साहाय्याने करू शकतो. या यंत्राला चालवण्याकरिता ३० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरची आवश्यकता आहे.

या यंत्राच्या साहाय्याने १० ते १५ मीटर उंचीवरील फळबागेतील कामे विविध हत्यारांच्या सहाय्याने करता येतात. हे यंत्र प्राथमिक प्रशिक्षणानंतर मजूर वापरू शकतो. या यंत्राचा वापर करून प्रति दिवशी १५० झाडांवरील नारळ काढणे शक्य आहे. तसेच हापूस आंब्यावरील ताशी ४०० ते ५०० आंबे काढता येतात. सदर यंत्राची किंमत २,२५,००० रुपये आहे.

कोनोविडर :

भातपिकातील तण नियंत्रणाकरिता १३० मि.मी. रुंद कोनोविडर विकसित करण्यात आले आहे. या अवजाराला दोन शंकू आकाराचे दातेरी कोन दिलेले असून भात रोपांचे ओळीत चालवताना विडरचे वजन सांभाळण्याकरिता फ्लोट दिलेला आहे. हे अवजार मनुष्याद्वारे चालवण्याकरिता दोन दांडय़ांचा आधार असलेले लांब हँडल दिले आहे. कोनोविडर चालविणा-या व्यक्तीच्या उंचीनुसार हँडलची उंची कमी-जास्त करण्याकरिता यंत्रणा देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार फ्लोटची उंचीसुद्धा कमी-जास्त करण्याची सोय आहे.

कोनोविडर भातरोपांचे ओळीत चालवताना वजन लोटवर घेऊन कोनोविडर फक्त पुढे ढकलत दोन्ही कोन टेकवत चालवावे. मागे-पुढे चालवू नये. कोनोविडरचा वापर करताना भात खाचरात कमीत कमी ५ ते ६ सें.मी. पाणी आवश्यक असते. कोनोविडरचा वापर करून भात खाचरातील तणाचे नियंत्रण तसेच खत मातीत गाडणे शक्य होते.

कोनोविडरचा वापर केल्यास ५०-६० टक्के वेळेत बचत होते. तसेच तण नियंत्रण खर्चातही बचत होते. कोनोविडरचा वापर करून ताशी ०.०८ ते ०.१० हेक्टर (८-१० गुंठे) क्षेत्रावरील तणाचे नियंत्रण करता येते. कोनोविडर डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे उपलब्ध असून त्याची किंमत १२०० रुपये आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट