देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात आवाज उठवत ज्येष्ठ साहित्यिकांनी सरकारला पुरस्कार परत केले होते.
नवी दिल्ली- देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात आवाज उठवत ज्येष्ठ साहित्यिकांनी सरकारला पुरस्कार परत केले होते. मात्र, पुरस्कार परत घेण्याची तरतूद साहित्य अकादमीच्या नियमावलीत नसल्याने हे साहित्यिक आपला पुरस्कार परत घेणार आहेत.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी म्हणाले की, साहित्य अकादमीने ज्येष्ठ साहित्यिकांना त्यांचे पुरस्कार परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. अकादमीच्या नियमानुसार दिलेला पुरस्कार परत घेण्याची तरतूद नसलेल्या नियमावलीची प्रतही पाठवली आहे.
कारण कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या आणि देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे गेल्या काही महिन्यात जवळपास ४० साहित्यिकांनी सरकारला त्यांचे पुरस्कार परत दिले होते.
त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी साहित्य अकादमीने एकमताने पुरस्कार मंजूर करून साहित्यिकांना त्यांचे पुरस्कार परत घेण्याचे आवाहन केले होते. तसेच साहित्य अकादमीने कलबुर्गीच्या हत्येचा निषेध केला होता.
१० साहित्यिक पुरस्कार परत घेण्यास तयार जवळपास १० साहित्यिकांनी पुरस्कार परत घेण्याची तयारी दर्शवली आहे. यात ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सेहगल व नंद भारद्वाज यांचा समावेश आहे.