केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या विरोधात आठवडाभर सुरु असलेले विरोध प्रदर्शन राज्यसभा अध्यक्षांच्या आवाहनानंतर विरोधकांनी थांबवले आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या विरोधात आठवडाभर सुरु असलेले विरोध प्रदर्शन राज्यसभा अध्यक्षांच्या आवाहनानंतर विरोधकांनी थांबवले आहे.
राज्यसभा अध्यक्ष हमिद अन्सारी यांनी सर्व सदस्यांना केलेले आवाहन आणि सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर विरोधकांनी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सुरु असलेले विरोध प्रदर्शन तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा अध्यक्षांनी सर्व सदस्य आणि सर्वपक्षीय नेत्यांना सौजन्य राखण्याचे आणि सार्जनिक हिताच्या दृष्टीने अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी यावेळी आवाहन केले. त्यामुळे साध्वी वादग्रस्त विधानावर विरोधकांनी पडदा टाकून हा विषय तुर्तास संपवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर रोजी याप्रकरणी संसदेत निवेदन सादर केले होते. मात्र पंतप्रधानांच्या या निवेदनाने विरोधकांचे समाधान झाले नव्हते. त्यानंतरही विरोधकांनी साध्वी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहाचे कामकाज होऊ दिले नाही. या विरोधात विरोधी पक्षातील नऊ पक्षांनी एकत्र येत ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सोमवारी सकाळी कामकाज सुरु होताच विरोधकांनी साध्वी यांच्या राजीनाम्याची आणि निंदा प्रस्ताव आणण्याची मागणी करत सभागृहात जोरदार गदारोळ केला. ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १५ मिनिटे, नंतर १० मिनिटे आणि त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. यानंतर राज्यसभा अध्यक्ष हमिद अन्सारी यांनी सर्व सदस्यांना शांतता राखण्यासाठी आवाहन केले आणि सर्वपक्षीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या निवेदनाच्या आधारे सभागृहात अध्यक्षांनी प्रस्ताव वाचून दाखवावा, असे सर्वपक्षीय चर्चेअंती ठरवण्यात आले आणि या विषयावर विरोधक शांत झाले.
देशातील मुस्लीम व ख्रिश्चन हे रामाचे वंशज आहेत, ज्यांना हे मान्य नाही त्यांनी देश सोडला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सोमवारी केले होते. वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी मंगळवारी माफी मागितली.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे हे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि भान राखून विधाने केली पाहिजेत. संसदेत हा विषय उपस्थित होण्याआधीच मी साध्वी ज्योती यांचे विधान फेटाळून लावले होते. यापुढे असे शब्द वापरु नका असे मी भाजप खासदारांना बजावले आहे. अशा गोष्टी कोणीही मान्य करु शकत नाही. साध्वी निरंजन ज्योती यांनी सभागृहाची माफी मागितली आहे त्यामुळे आता हा विषय संपवावा असे आवाहन मोदी यांनी संसदेच्या सभागृहाला केले होते.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर मतदार संघातून साध्वी निरंजन ज्योती या निवडून आल्या असून, मोदी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री आहेत.
»» संबंधित बातम्या….
» साध्वीच्या विधानावरुन गदारोळ कायम
» साध्वींनी केलेले वक्तव्य निषेधार्ह – पंतप्रधान
» साध्वींच्या विधानावरुन संसदेत विरोधक आक्रमक
[EPSB]
साध्वी यांच्या माफीने विरोधकांचे असमाधान
मुस्लिम, ख्रिश्चन हे रामाचे पुत्र आहेत असे आक्षेपार्ह विधान करणा-या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी संसदेत माफी मागितली.
[/EPSB]