Saturday, June 1, 2024
Google search engine
HomeUncategorizedक्रिकेट विश्वचषक २०१५१९८३ वर्ल्डकप विजेता भारत

१९८३ वर्ल्डकप विजेता भारत

१९८३ विश्वविजेता भारत
१९८३ विश्वविजेता भारत

विश्वचषक तिसरा – १९८३
यजमान – इंग्लंड 
विजेता-  भारत, उपविजेता – वेस्ट इंडिज  
अंतिम फेरीचे ठिकाण – लॉडर्स
सहभागी संघ – आठ 
कालावधी – नऊ जून ते २५ जून १९८३
एकूण सामने – २७


१९८३ सालची विश्वचषक स्पर्धाही प्रुडेन्शियल अॅश्यूरन्स कंपनीने प्रायोजित केल्याने तिसरा विश्वचषकही प्रुडेन्शियल विश्वचषक म्हणून ओळखला जातो. आयसीसीने सलग तिस-यांदा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचा मान इंग्लंडला दिला. या विश्वचषकाने फक्त भारतीय क्रिकेटलाच कलाटणी दिली नाही तर, क्रिकेटला एक नवा जगज्जेता मिळवून दिला तसच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचा दबदबा कमी केला. १९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. या विश्वचषकातही आठ संघांनी सहभाग घेतला. चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकासारखेच या स्पर्धेचे स्वरुप होते फक्त साखळी फेरीत प्रत्येक गटातील संघांचे परस्पराविरुध्द दोन सामने झाले. याआधीच्या विश्वचषकात प्रत्येक गटातील संघ परस्पराविरुध्द एकच सामना खेळला होता. दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्यफेरीत आणि उपांत्यफेरीतील विजेते अंतिम फेरीत असे या स्पर्धेचे स्वरुप होते. या स्पर्धेत आयसीसीचे कायमस्वरुपी सदस्य सात संघ होते तर १९८२ आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून झिंम्बावे विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.


१९८३ विश्वचषक वैशिष्टये

  • २५ जून १९८३ या दिवशी लंडनच्या लॉडर्स मैदानावर क्रिकेटमधील सर्वात मोठया धक्कादायक निकालाची नोंद झाली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने बलाढय वेस्ट इंडिजवर ४३ धावांनी विजय मिळवला आणि भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची करामत केली. कर्णधार कपिल देव यांनी झळाळता प्रुडेन्शियल विश्वचषक उंचावला.
  • भारताच्या रुपाने प्रथमच उपखंडाला क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळाले.
  • १९८३ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या डेविड गॉवर यांनी सर्वाधिक ३८४ धावा केल्या.
  • भारताच्या रॉजर बिन्नी यांनी सर्वाधिक १८ गडी बाद केले.
  • १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार नव्हता.
  • विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मोलाच्या ठरणा-या २६ धावा करुन, सात षटकात बारा धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करण्याची अष्टपैलू कामगिरी करणा-या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • नऊ जून १९८३ रोजी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या नवख्या झिंम्बावे संघाने बलाढय ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवून पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली.
  • १९८३ मध्ये पाकिस्तानने सलग दुस-यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.
  • सत्तरच्या दशकात एकदिवसीय सामने ६० षटकांचे होते. त्यामुळे १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामना ६० षटकांचा खेळवण्यात आला.
  • तिसरी विश्वचषक स्पर्धाही सर्वच संघ क्रिकेटचा पारंपारिक सफेद रंगाचा गणवेश घालून खेळले. या स्पर्धेत लाल रंगाचा चेंडू वापरण्यात आला.

तिस-या विश्वचषकात भारत

1983 Cricket WC (8)पहिला साखळी सामना 
भारत विरुध्द वेस्ट इंडिज
१९८३ विश्वचषक स्पर्धेत आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. भारतीय संघ ‘ब’ गटात होता. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, झिम्बांबे हे संघ भारताच्या गटात होता. नऊ जूनला वेस्टइंडिज विरुध्द भारताचा पहिला सामना होता. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. ६० षटकांच्या या सामन्यात भारताने २६२ धावा केल्या. भारतातर्फे यशपाल शर्माने १२० चेंडूत सर्वाधिक ८९ धावा केल्या. भारताच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सर्वबाद २२८ धावा केल्या. भारताने ३४ धावांनी हा सामना जिंकला.
सामनावीर – यशपाल शर्मा


1983 Cricket WC (9)दुसरा साखळी सामना
भारत विरुध्द झिंबाब्वे
११ जूनरोजी झिंबाब्वे विरुध्दच्या दुस-या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने झिंबाब्वेला १५५ धावांवर रोखले. भारताने पाच विकेट आणि १३५ चेंडू राखून आरामात हे आव्हान पार केले. दहा षटकात २७ धावा देऊन तीन बळी घेणा-या मदनलालला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामनावीर – मदनलाल


तिसरा साखळी सामना
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया

१३ जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुध्द भारताचा तिसरा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ६० षटकात ३२० धावा केल्या. भारताने या धावसंख्येचा पाठलाग करताना १५८ धावात नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने १६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सर्वाधिक ११० धावा करणा-या टीएम चॅपलला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.
सामनावीर – टीएम चॅपल


1983 Cricket WC (10)चौथा साखळी सामना
भारत विरुध्द वेस्ट इंडिज
साखळी गटातील लढतीत वेस्ट इंडिज विरुध्द भारताचा हा दुसरा सामना होता. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने साठ षटकात २८२ धावा केल्या. बदल्यात भारताला फक्त २१६ धावा करता आल्या. वेस्ट इंडिजने ६६ धावांनी विजय मिळवला. भारताविरुध्द ११९ धावांची खेळी करणा-या व्हिव्हियन रिचडर्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
सामनावीर – व्हिव्हियन रिचडर्स


पाचवा साखळी सामना
भारत विरुध्द झिंम्बाबे
विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठण्यासाठी झिंम्बाबे विरुध्दच्या सामन्यात भारताला विजय अत्यावश्यक होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण अवघ्या १७ धावात भारताचे पाच गडी तंबुत परतले होते. भारताचा पराभव अटळ दिसत होता. पण या निर्णयाक क्षण कपिल देवने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि सामन्याचा नूरच पालटून टाकला. कपिलने १३८ चेंडूत नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. या खेळीत कपिलने १६ चौकार आणि सहा षटकार लगावले. कपिलच्या शतकाच्या जोरावर भारताने झिंम्बाबेसमोर २६७ धावांचे आव्हान ठेवले. झिंम्बाबेचा डाव २३५ धावात संपुष्टात आला.
सामनावीर – कपिल देव


सहावा साखळी सामना
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया विरुध्दचा अखेरचा साखळी सामना भारताने ११८ धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने २४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव १२९ धावात गडगडला. ऑस्ट्रेलियाचे चार विकेट घेणारा रॉजर बिन्नी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
सामनावीर – रॉजर बिन्नी


ग्रुप ए

संघ गुणतालिका सामने जय पराजय रनरेट
इंग्लंड २० ४.६७१
पाकिस्तान १२ ४.०१४
न्यूझीलंड १२ ३.९२७
श्रीलंका ३.७५२

ग्रुप बी

संघ गुणतालिका सामने जय पराजय रनरेट
वेस्ट इंडिज २० ४.३०८
भारत १६ ३.८७०
ऑस्ट्रेलिया ३.८०८
झिंम्बावे ३.४९२

पहिली उपांत्यफेरी
भारत विरुध्द इंग्लंड
ऑल्ड ट्रॅफडवर झालेल्या उपांत्यफेरीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला ६० षटकात २१३ धावांवर रोखले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फ्लॉवरने सर्वाधिक ३३ धावा केल्या. भारताकडून कपिलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारताने चार विकेट गमावत हे आव्हान सहज पार केले आणि सामना सहा विकेटने जिंकला. भारताकडून यशपाल शर्माने आणि संदीप पाटीलने अर्धशतके झळकवली. ४६ धावा करुन दोन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले.
सामनावीर – मोहिंदर अमरनाथ


दुसरी उपांत्यफेरी

पाकिस्तान विरुध्द वेस्ट इंडिज

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज सलग दुस-यांदा विश्वचषक स्पर्धेत उपांत्यफेरीत समोरासमोर आले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीला निमंत्रित केले. विडिंजच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानला १८४ धावांवर रोखले. पाकिस्तानकडून मोहसीन खानने एकाकी लढत देत विडिंजच्या तोफखान्याचा समर्थपणे सामना केला. मोहसीन खानच्या १७६ चेंडूतील ७० धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. माल्कम मार्शलने तीन, अँडी रॉबर्टसने दोन गडी बाद केले. वेस्ट इंडिजने दोन गडी गमावून सहज हे आव्हान पार केले. वेस्ट इंडिजकडून व्हिव्हियन रिचर्ड्स रिचडर्सने सर्वाधिक ९६ चेंडूत ८० धावांची खेळी केली. रिचडर्सने आपल्या खेळीत अकरा चौकार आणि एक षटकार लगावला. लॅरी गोम्सने नाबाद अर्धशतक झळकवत त्याला चांगली साथ दिली.

सामनावीर – व्हिव्हियन रिचर्ड्स


1983 Cricket WC (2)अंतिम सामना
भारत विरुध्द वेस्ट इंडिज

लॉडर्सवर झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. रॉबर्ट, मार्शल, गार्नर, होल्डींग, हेन्स, लॉईड आणि रिचडर्स अशा एकाहून एक रथी-महारथींनी भरलेल्या वेस्ट इंडिजसंघासमोर भारताचा निभाव लागणार नाही असाच सर्वांचा समज होता. सुरुवातही तशीच झाली होती. भारत नाणेफेकिचा कौल हरला होता. वेस्ट इंडिजने भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.

विडिंजच्या तोफखान्यासमोर भारताचा संघ १८३ धावात गारद झाला. भारताकडून क्रिष्णमचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथने प्रत्येकी २७ आणि २६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. विजयासाठी १८४ धावा विंडिजसाठी अत्यंत माफक लक्ष्य होते. वेस्टइंडिज सलग तिस-यांदा विश्वविजेतेपदाची हॅट्रीक करणार असाच सर्वांचा समज होता. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. वेस्ट इंडिजचे रथी-महारथी फलंदाज भारताच्या मध्यमगती मा-यासमोर ढेपाळत गेले.

मदनलालच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धोकादायक अशा व्हिव्हियन रिचडर्सचा झेल कपिलने १८ ते २० यार्ड धाव घेत टिपला आणि भारत इतिहास घडवणार हे निश्चित झाले. विडिंजकडून रिचडर्सने सर्वाधिक ३३ धावा केल्या होत्या. वेस्टइंडिजचा डाव ५२ षटकात १४० धावात संपुष्टात आला आणि भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. २६ धावा आणि तीन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.
सामनावीर – मोहिंदर अमरनाथ


१९८३ च्या विश्वचषकातील भारतीय संघ 

भारतीय संघ
कपिल देव (कर्णधार)
मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार)
किर्ती आझाद
रॉजर बिन्नी
सुनील गावस्कर
सय्यद किरमाणी
मदनलाल
संदीप पाटील
बलविंदर संधू
यशपाल शर्मा
रवि शास्त्री
क्रिष्णमचारी श्रीकांत
सुनील वाल्सन
दिलीप वेंगसरकर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट