बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कर्णधार विराट कोहलीने मधल्या फळीत अनुभवी अजिंक्य रहाणेला पसंती दर्शवली आहे.
हैदराबाद- बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कर्णधार विराट कोहलीने मधल्या फळीत अनुभवी अजिंक्य रहाणेला पसंती दर्शवली आहे. ‘‘एखाद्या मालिकेत (इंग्लंडविरुद्ध) खराब कामगिरी झाली म्हणून अजिंक्यवर अन्याय करता येणार नाही.
मागील दोन वर्षात त्याने सर्वोत्कृष्ट फलंदाजी करताना सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कसोटीतील रहाणेची सरासरी जवळपास ५० इतकी आहे.
मधल्या फळीत त्याच्यासारख्या फलंदाजाची आवश्यकता आहे. करुण नायर युवा आणि प्रतिभावंत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध शानदार त्रिशतक ठोकत संघातील आपले स्थान नक्की केले तरी केवळ एका मॅचमधील कामगिरीच्या जोरावर त्याला अंतिम संघात निवडून अजिंक्यसारख्या अनुभवी आणि मेहनती फलंदाजावर अन्याय करता येणार नाही,’’ असे कोहलीने म्हटले.