भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशात ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा एका घोटाळ्याचा भाग असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली- भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशात ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा एका घोटाळ्याचा भाग असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
या नोटा बंद होणार असल्याची माहिती काही जणांना देण्यात आल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. ते शनिवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घोषित करण्यापूर्वीच काळा पैसा असलेल्या काही जणांना सावध केले होते.
त्यामुळे या सर्वांनी निर्णय घोषित होण्यापूर्वीच आपल्या काळ्या पैशाचा योग्य विनियोग केला, असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत बँकेत मोठया प्रमाणात पैसे जमा करण्यात आले असून, बँकांमधील या रकमेची आकडेवारी पाहता संशय निर्माण झाला आहे.