गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील बळीराजा सुखावला आहे.
मुंबई- गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील बळीराजा सुखावला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-याला पावसाने चांगलाच दिलासा दिला. मात्र या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची भिती व्यक्त होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात ७७ दिवसांपैकी केवळ २९ दिवसच पाऊस झाल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट कोसळले होते. खरिपाची पिके जळून गेली होती. त्यामुळे शेतक-यांनी आपले जीवन संपवले होते.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शनिवारपासून सर्वत्र पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळ या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला.
मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. ७६ पैकी ४७ तालुक्यातील तब्बल १७१ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड, बीड, लातूरमध्ये पावसाने दमदार बॅटींग केली. नांदेडमध्ये विक्रमी १४४ मिमी पावसाची नोंद झाली तर उस्मानाबादमध्ये आतापर्यंत १५१ मिमी पाऊस झाला.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार
पुणे (२९ मिमी)
महाबळेश्वर (६२ मिमी)
सोलापूर (२७ मिमी)
औरंगाबाद (४१ मिमी)
नाशिक ३१ (मिमी)
उदगीर (४५ मिमी)
चंद्रपूर (४५ मिमी)
बुलडाणा (३९ मिमी)
यवतमाळ (३९ मिमी)
परभणी (४७ मिमी)