जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’ने स्वीकारली आहे.
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’ने स्वीकारली आहे.
या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. सोशल मिडियावर एक पोस्टर झळकत असून त्यात पाकच्या पंजाब गुंजरवाला भागात उरी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्याच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ‘जमात उल दवा’ चा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद मार्गदर्शन करणार आहे. उरी हल्ल्यानंतर आजही पाकिस्तानच्या ना-पाक कारवायांविरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे.