केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आणि महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर स्वच्छता पंधरवडा अभियान चालवण्यात येणार आहे.
मुंबई- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आणि महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर स्वच्छता पंधरवडा अभियान चालवण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर, २०१७ रोजी हे अभियान सकाळी ८ ते रात्री ८ असं चालवण्यात आलं.
याप्रसंगी एक्स्प्रेसवेच्या स्वच्छतेचं अभियान संपूर्ण वर्षभर चालवण्याचा निर्धार महामंडळाने केला आहे. एक्स्प्रेसवेवरच्या चारही पेट्रोल पम्प, चार फूड मॉल्स त्याचबरोबर दोन टोल प्लाझाचे कर्मचारी या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून संपूर्ण मुंबई पुणे एक्स्प्रेसवे स्वच्छ करण्यात आला आणि वर्षभर अशा प्रकारे हा महामार्ग सातत्याने स्वच्छ केला जाईल असे महामंडळाने ठरवलं आहे.
या सामाजिक उपक्रमावर भाष्य करताना महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरूंदकर म्हणाले, रस्ते स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वाहतूक सुरळीतपणे आणि अखंड चालू राहावी यासाठी आपले महामार्ग आणि एक्स्प्रेसवे कायम स्वच्छ ठेवले पाहिजेत. हे ध्यानात ठेऊनच आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. हे अभियान १५ दिवस चालणार असलं तरी आम्ही हे कार्य वर्षभर चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
[EPSB]
[/EPSB]