सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर नागरिक कोणतीही खातरजमा न करता मजकूर टाकतात आणि पुढे पाठवतात (फॉरवर्ड करतात.) त्यामुळे त्याचे काही फायद्याबरोबर तोटेही मोठे होत आहेत. सोशल मीडियात विश्वासार्हता नसल्यामुळे त्यावर ‘कंट्रोल सिस्टीम’ आवश्यक आहे. ?वाहिन्यांनीही अधिक जबाबदार व्हायची गरज आहे ?
आजच्या घडीला मोबाईल सर्वात जास्त पॉवरफूल झाला आहे. देशातील सर्वच घडामोडींमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावित असतो. ? ?सोशल मीडियावर काहीही लिहिता आणि टाकता येते. सोशल मीडियावर कोणाचेही नियंत्रण नाही.? याला कारण सोशल मीडिया नागरिकांच्या हातामध्ये आला आहे. त्यामुळे कुठल्याही समाजाबद्दल, व्यक्तीबद्दल काहीही लिहिले जाते. कोणाही व्यक्तीला अकारण मोठे केले जात आहे.
महत्त्वाचा प्रश्न बाजूला पडून छोटा प्रश्न राष्ट्रीय होत आहे. जुनी माहिती, व्हीडिओ नवीन असल्याचे सांगून जातीधर्मामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. त्यामुळे या माध्यमातील माहितीवर कुठेतरी अंकुश लावणे गरजेचे झाले आहे. ?सोशल? मीडियामुळे नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे पत्रकारांशी बोलतच नाहीत. ?त्यांना थेट सर्वाशी बोलता येते, त्यामुळे पारंपरिक मीडिया त्यांना लागत नाही. ?त्यामुळे त्यांना जाब विचारता येत नाही.
सर्वत्र ‘टीआरपी’चा जमाना आला आहे. त्यामुळे या वाहिन्यांमध्ये अभिनयाला जास्त आणि बातमीला कमी महत्त्व असल्याचे दिसते. ज्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे ज्ञान नसते ते या वाहिन्यांचे संपादक झाले आहेत. त्यांच्या मते लोकांना ‘सनसनी’ पाहिजे, पण सामाजिक जाणीव नको असते. त्यामुळे ज्या बातमीला प्रेक्षकसंख्या अधिक तीच बातमी त्यामध्ये दाखविली जात आहे. कोणतीही क्षुल्लक बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ केल्यामुळे तिची विश्वासार्हता कमी होत चालली आहे.
चॅनेलवर कृषी विकास, दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्या, समाजातील चांगले काम करणा-या व्यक्तींची माहिती दाखवायला जागा नाही. मात्र, कुठल्यातरी कलाकाराच्या गुडघ्याला दुखापत झाली यावर ते चर्चा करीत बसतात. सध्या जे मोठय़ा आवाजात बोलतात त्यांनाच टीव्हीवर चर्चा करायला बोलाविले जाते. फक्त ‘अँकरचा आवाज’ येतो, जनतेचा आवाज कुठे गेला आहे?
राष्ट्रवादाच्या नावाखाली धार्मिक विद्वेषाला खतपाणी घातले जात आहे. त्याचे भविष्यात वाईट परिणाम होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारपूर्वक देशामध्ये ध्रुवीकरण घडवून आणले जात आहे. वस्तुस्थिती भाष्य करणा-या पत्रकारांनाही राष्ट्रविरोधी ठरविण्यात येत आहे. टीआरपीच्या स्पर्धेत बातम्यांमध्ये नाटय़ आणून वृत्तवाहिन्यांनी तमाशा चालविला आहे.
देशाला नव्या विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. एका बाजूला धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या नावाखाली भ्रष्टाचार करून गब्बर झालेले राजकीय पक्ष आहेत. दुस-या बाजूला हिंदुत्वाच्या नावाखाली विद्वेष पसरवणारा पक्ष आहे. या दोघांनाही वठणीवर आणण्यासाठी ‘पप्पू’ आणि ‘फेकू’च्या व्यतिरिक्त एका नव्या पयार्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पूर्वी टीका केली तरीही राजकारणी पत्रकारांशी संवाद कायम ठेवत असत.
मात्र, आता राजकारणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी बोलणे अधिक पसंत करतात. त्यांना पत्रकारांशी बोलायचेच नाही. राजकारणी माध्यमांना घाबरतात. मात्र, आदर करीत नाहीत. लिबरल होणेही शिवी झाली आहे.
प्रादेशिक पत्रकारितेला महत्त्व प्राप्त होत आहे. इंग्रजीच्या तुलनेत प्रभावी पत्रकारिता होत आहे. वृत्तवाहिन्यांचे पत्रकार स्टुडिओमध्ये बसून, मसाला बातम्या देतात. मात्र, त्यांना वास्तव (ग्राऊंड रिअॅलिटी) माहिती नसते. पत्रकारिता जमिनीवर राहूनच केली पाहिजे. तासन्तास डिबेट चालतात. मात्र, आम्ही लोकांना बातमी देत नाही. मीडियावर इंव्हेटद्वारे धंदा केला जात आहे. नरेंद्र मोदी, व्ही. के. सिंह, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल हे पत्रकारांना दलाल, न्यूज ट्रेडर वगैरे बिरुदे लावून टीका करतात. ही स्थिती येण्यास आपणच कारणीभूत आहोत.
खरा पत्रकार हा मातीशी जोडलेला असतो, तो कधीच कार्यालयात बसून राहात नाही. मात्र सध्याच्या पत्रकारितेची परिस्थिती काँग्रेस पक्षासारखी झाली आहे. काँग्रेसचे सर्वच नेते राज्यसभेमध्ये बसण्यास उत्सुक असतात. मात्र निवडणूक लढायला कोणीच उत्सुक नसते. न्यूज चॅनेललाही मातीशी जोडल्या गेलेल्या पत्रकारांची गरज राहिलेली नाही. स्टुडियोत बसून? ते ?एकमेकांना टीका करायला लावतील. आवाज वाढवायला लावतील, मात्र बातमी कधीच देणार नाहीत, ते फक्त डिबेट करतील. त्यांना फक्त सनसनाटी हवी. अशामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काश्मीर हातून सुटत चालला आहे काश्मीरमधील वातावरण अत्यंत गंभीर असून, तेथील तणाव वाढत चालला आहे. काश्मीर आपल्या हातून सुटत चालला आहे, जर येथील जनतेचा राग समजून घेतला नाही, तर भविष्यात काश्मीर हातून निसटेल. भविष्यात देशामधील हिंदू-मुस्लीम संबंध गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियाचा वापर करून अफगाणिस्तानातील व्हीडिओ मुझफ्फरपूर येथील आहेत, असे भासविण्यात आले. हे करणारा मनुष्य उत्तर प्रदेशातील मंत्री आहे, त्याचा भाऊ केंद्रीय मंत्री आहे. हिंदू-मुस्लीम संबंधही भविष्यात गंभीर स्वरूप धारण करतील. ?हा धोका आपण ओळखला पाहिजे. आणि माध्यमांनी आपली भूमिका ओळखली पाहिजे.