Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeशिकू आनंदेबीज अंकुरे अंकुरे..

बीज अंकुरे अंकुरे..

ऑलिंपिकमध्ये भारताला पदकं मिळत नाहीत म्हणून मोठय़ा हिरिरीने मित्रपरिवारात आपल्याकडे खेळाडू तयार व्हायला कसं पोषक वातावरण नाही यावर मतप्रदíशत करणारे हेच पालक आपल्या पाल्याची खेळाकडे असणारी ओढ समजून न घेता, त्याला प्रोत्साहन न देता फक्त अभ्यासक्रमच महत्त्वाचा मानतात.

lead2कोणतंही बीज कुठेही रूजत नाही. त्यासाठी पोषक वातावरण, उत्तम माती, खत, योग्य पाणी यांची गरज असते तसंच विद्यार्थ्यांचंही असतं. योग्य विचार, मार्गदर्शन त्यांना मिळालं तर हे विद्यार्थी बिजासारखंच रूजून स्वत:ची ओळख बनवू शकतात.

बॅचलर ऑफ मास मीडिया अर्थात बीएमएमच्या विद्यार्थ्यांना शिकवताना अनेकदा माझ्या शिक्षकांनी शिकवताना वापरलेल्या अनेक पद्धती मला आज उपयोगी पडतात. यातलीच एक पद्धत म्हणजे स्वत:तले पाच गुण आणि पाच अवगुण कोणते याची माहिती विद्यार्थ्यांनी लिहिणं. प्रथम वर्ष मराठी बीएमएमच्या विद्यार्थ्यांना संभाषणात्मक कौशल्य हा विषय शिकवताना मी दरवर्षी त्यांच्याकडून त्यांच्यातले गुण, अवगुण कोणते ते समजून घेते.

गेली जितकी र्वष मी हा उपक्रम राबवत आहे तेवढी सगळी वष्रे एक-दोन अपवाद वगळता बहुतेक विद्यार्थी आपल्यातले अवगुण पटकन सांगतात, पण गुण सांगण्यासाठी त्यांना विचार करावा लागतो. वरवर बघता हा उपक्रम अगदी सोपा आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा गुण, अवगुण लिहिण्याची वेळ येते तेव्हा ते किती कठीण आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं.

खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांत काही ना काही गुण असतातच. पण अनेकांना ते माहीतच नसतात; कारण असे गुण त्यांच्या लक्षात येण्याची संधीच त्यांना कधी मिळालेली नसते. लहानपणापासूनच प्रत्येक जण हा अज्ञानी, अननुभवी, चंचल असतो, चांगलं, वाईट याची जाणीव नसते, त्याला सतत मार्गदर्शन करण्याची गरज असते, असाच बहुसंख्य पालकांचा आणि शिक्षकांचा समज असतो. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतं शिक्षण घ्यायचं, कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं याचे निर्णय अनेकदा पालकच घेताना दिसतात. याचा अनुभव एक शिक्षक म्हणून आम्हाला सतत येत असतो.

पाल्यानं इतर कोणत्याही उपक्रमात भाग घेण्याऐवजी फक्त आणि फक्तअभ्यासच करावा, यासाठीही पालकांकडून अनेकदा नको इतकं दडपण आणलं जातं. आमच्याकडे असणारी एक विद्याíथनी शाळेत असताना सतत पहिल्या, दुस-या क्रमांकाने उत्तीर्ण होत असे. मात्र महाविद्यालयातल्या वातावरणाशी जुळवून घेत असताना, क्रमिक पुस्तकं, गाईड, कोचिंग क्लासेस यांच्या मदतीशिवाय कराव्या लागणा-या अभ्यासामुळे हा क्रमांक किंचित घसरला.

पहिल्या तिनात आपली मुलगी नाही याचा तिच्या पालकांना इतका राग आला, की एक संपूर्ण रात्र त्या मुलीला घराबाहेर उभं राहण्याची शिक्षा त्यांनी दिली. ही विद्याíथनी खूप छान डान्स करायची. पण डान्सपेक्षाही तिचा अभ्यास आणि तिचा उत्तीर्ण होण्याचा क्रमांकच तिच्या पालकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला होता.

एक शिक्षक म्हणून माझा अनुभव आहे, की प्रत्येक विद्यार्थी हा नेहमीच आत्मपरीक्षण करत असतो. त्याला आपल्या भावना, स्वप्नं, क्षमता, उणिवा यांची पूर्ण जाणीव असते. तो सतत स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करत असतो. स्वत:च्या विचार प्रक्रियेचं परीक्षण करत असतो. त्याला स्वत:ची उत्तम ओळख असते, मात्र हे उघडपणानं सांगण्याची वेळ अनेकदा त्यांना मिळतच नाही. त्यामुळे आपल्यात हे गुण आहेत, याची स्पष्ट जाणीव त्यांना होत नाही.

‘डिस्क्लेसिया’सारख्या विषयावर आलेला ‘तारे जमीं पर’सारखा चित्रपट, त्यातून निर्माण झालेलं विद्यार्थ्यांचं भावविश्व, त्याच्या भविष्याबाबत पालकांमध्ये निर्माण झालेली भीती, त्यावर मात करण्यासाठी शिक्षकानं पुढाकार घेऊन केलेले प्रयत्न, यात त्याला मिळालेलं यश हे सारं बघून मला आमच्याच एका विद्यार्थ्यांची आठवण झाली.

डिस्क्लेसिया असलेला हा विद्यार्थी लिहिण्या-वाचण्यात नेहमीच चुका करत असे. त्यामुळे परीक्षेत पेपर लिहिताना आणि तो पेपर तपासताना आम्ही नेहमीच त्याला झुकतं माप देत असे. मात्र या विद्यार्थ्यांला जाहिराती बघणं, त्यावर विचार करणं, नव्या जाहिरातींसाठी ‘थीम’ सुचवणं यात खूपच रस होता.

इतकंच नाही तर, त्यानं जाहिरातींच्या सुचवलेल्या या कल्पना इतक्या वेगळ्या, नावीन्यपूर्ण असत की हा विद्यार्थी इतका विचार कसा काय करू शकतो? याचं आश्चर्य आम्हाला वाटायचं. त्याचे पालक, आम्ही शिक्षक त्याच्या या गुणाला नेहमीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असायचो.

मला विशेष कौतुक वाटायचं ते त्याच्या पालकांचं. आपला मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे, हे लक्षात आल्यानंतर त्याचा बाऊ न करता त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात जायला, शिक्षण घ्यायला पूर्ण प्रोत्साहन दिलं. त्या विद्यार्थ्यांलाही आपल्यात काय कमी आहे, यापेक्षा काय चांगलं आहे याची असणारी जाणीव सुखावणारी होती.

विद्यार्थ्यांमध्ये असणारे गुण शोधायला शिक्षकानं प्रयत्न करायला हवेत, असं मला वाटतं. याची सुरुवात अतिशय सोप्या सोप्या प्रश्नांनी करता येऊ शकते. तुला काय आवडतं, काय नावडतं? भविष्यात कोण व्हायचं आहे? छंद कोणता? कोणत्या व्यक्ती आवडतात? त्याच का आवडतात? एकटं असताना तुम्ही कोणते विचार करता? त्यातले कोणते विचार योग्य वाटतात? कोणते अयोग्य? का? यासारख्या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करता येतं.

अशा अनेक प्रश्नांच्या मदतीनं माझ्यातल्या शिक्षकाला कसं शिकवायचं याचाही अंदाज येतो. आपण फारसे बोलके नाही पण आपल्या हातून कागदावर उतरणारे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात, आपण चांगली बातमी किंवा चांगली ‘जाहिरात कॉपी’ लिहू शकतो ही जाणीव विद्यार्थ्यांना याच गुण-अवगुणांच्या छोटय़ाशा चाचणीतून व्हायला लागते.

खरं तर शालेय जीवनात आपल्या पाल्याची चौफेर प्रगती व्हावी म्हणून विविध क्लासेसना घालणारे पालक वेळ आली तर मात्र फक्तआणि फक्त परीक्षा, त्यातील गुणांनाच महत्त्व देताना दिसतात. ऑलिंपिकमध्ये भारताला पदकं मिळत नाहीत म्हणून मोठय़ा हिरिरीनं मित्रपरिवारात आपल्याकडे खेळाडू तयार व्हायला कसं पोषक वातावरण नाही यावर मतप्रदर्शित करणारे हेच पालक आपल्या पाल्याची खेळाकडे असणारी ओढ समजून न घेता, त्याला प्रोत्साहन न देता फक्तअभ्यासक्रमच महत्त्वाचा मानतात.

याशिवाय बी. एम. एम.च्या अनेक विद्याíथनींना भेडसावणारा एक मोठा प्रश्न म्हणजे इंटर्नशिपचा. घरी आई-वडील दोघंही कमवणारे असताना तुला नोकरीची गरजच काय असं म्हणून अनेक विद्यार्थिनी योग्य संधी असूनही त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण घ्यायला प्रोत्साहन देणारे हेच पालक आता मात्र का ठामपणे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत असा संभ्रम अनेकदा या मुलींच्या मनात निर्माण होतो. यातूनच विसंवादाला सुरुवात होते. म्हणूनच योग्य संवादाचा समन्वय पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असेल तर सकारात्मक बदल नक्कीच पाहायला मिळतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट