उरी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे पुरावे भारताने बुधवारी पाकिस्तानकडे सोपवले.
नवी दिल्ली- उरी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे पुरावे भारताने बुधवारी पाकिस्तानकडे सोपवले. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवावे, अशी मागणी भारताने केली.
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना बुधवारी पाचारण केले. उरी येथे दहशतवाद्यांकडे सापडलेली जीपीएसमधील माहिती, ग्रेनेडवरील पाकिस्तानच्या खुणा आदी पुरावे बसित यांच्याकडे सोपवले.
या सीमेपलीकडील हल्ल्याच्या तपासाची इच्छा असल्यास भारतात ठार झालेल्या दहशतवाद्यांचे डीएनएचे नमुने आणि हाताचे ठसे भारत देण्यास तयार आहे, असे त्यांनी बसित यांना सुनावले.