आपत्कालीन दल म्हणून अग्निशमन दलाकडे पाहिले जाते. पण अजूनही आग विझवणारे दल ते अग्निशमन दल असा ढोबळ विचार सर्वसामान्य आणि राजकारणी करत असतात. आग लागली की, त्यांना पाचारण केले जाते. इतर वेळी ही मंडळी आपापल्या केंद्रात आराम करत असतात, असाच विचार आजही सामान्य माणूस करतो. काळबादेवीतील इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाचे चार वरिष्ठ अधिका-यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या आधुनिकीरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. या आधीही अनेक वेळा अग्निशमन दलाला भेडसावणा-या अनेक समस्यांवरून हे दल चर्चेत राहिलेले आहे. पण पालिका प्रशासनाने या दलाला जणू वा-यावर सोडलेले आहे. मुंबईतील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आता नुकतीच ३० व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकेल आणि त्याद्वारे आग विझवणे शक्य होईल, अशी शिडी दाखल झाली आहे. फिनलँडमधून आयात केलेल्या या शिडीची किंमत १६ कोटी रुपये आहे. पाण्याचा मारा करणारी ही हायड्रोलिक शिडी आहे. मुंबई आणि उपनगरांना आता अशा प्रकारच्या अनेक शिडय़ांची आवश्यकता आहे. मुंबईत आता जुन्या चाळी आणि झोपडपट्टय़ा जाऊन त्या जागी उंच उंच इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधीकरणाच्या माध्यमातूनही आता उभ्या राहिलेल्या इमारती या सुमारे २३ ते २५ मजली आहेत. या इमारती अगदी टॉवरसारख्य़ा दिसत असल्या तरी त्यात टॉवर्ससारख्या सुविधा आणि आग विझवणारी यंत्रणा असेलच, याची शाश्वती नाही. काही उंच इमारतींमध्ये आग विझवणारी उपकरणे ठेवण्यात आलेली आहेत. परंतु त्यांची आग विझवण्याची क्षमता सुरू आहे की, ती संपली आहे, ती उपकरणे कालबाह्य झाली आहेत का, याची कोणालाही पर्वा नसते. अशा परिस्थितीत दुर्दैवाने अशा इमारतींमध्ये आगीची घटना घडली तर ३० मजल्यांपर्यंत पोहोचून मदत आणि बचावाचे काम करणे शक्य होऊ शकेल. मात्र, एका हायड्रोलिक शिडीने अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण होणार नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात येणारी उपकरणे, त्यांचे कपडे, गमबूट अशा कितीतरी गोष्टी कालबाह्य झालेल्या असतात किंवा त्या त्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. अशा वेळी दुस-याला वाचवण्यासाठी आगच्या लोळय़ात घुसणा-या जवानाचा स्वत:चाच जीव धोक्यात येतो. पोलिसांच्या वसाहती किंवा इमारती जशा जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत तशाच प्रकारे अग्निशमन दलाच्या काही इमारती या जुन्या झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. या हायड्रोलिक शिडीबरोबर अग्निशमन दलाने ३०० अग्निस्वयंसेवक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. आग लागल्यानंतर किंवा इमारत कोसळल्यानंतर बघ्याची गर्दी होते. हे बघे मदत तर करत नाहीत उलट त्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होतो. अशा वेळी प्रत्यक्ष अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत हे अग्निस्वयंसेवक तिथे पोहोचून परिस्थिती हाताळू शकतात. अडकून पडलेल्या लोकांना मदत करू शकतात. आजूबाजूच्या गर्दीवर नियंत्रण ठेवू शकतात. बघ्यांना आवरू शकतात. अग्निशमन दलाने अशा ३० जणांचे पहिले पथक तयार केले असून त्याचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत होईल. परंतु या दलाकडे आणि दलाच्या मागण्यांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करणे हा मुर्खपणा ठरेल. आग लागली, इमारत कोसळली किंवा विजेच्या खांबाला एखादा पक्षी अडकला तरी पहिल्यांदा आठवण होते की, अग्निशमन दलाची. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस, लष्कर यांच्याबरोबरीने आणि तितक्याच ताकदीने अग्निशमन दलाने केलेली कामगिरी आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे या दलाचे र्सवकष आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on