तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतर राज्यसभेने महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक सोमवारी मंजूर केले.
नवी दिल्ली- तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतर राज्यसभेने महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक सोमवारी मंजूर केले. याआधी २७ ऑगस्ट रोजी लोकसभेने या विधेयकाला मंजूरी दिली होती.
या विधेयकामुळे देशातील ८० कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य मिळण्याची हमी मिळणार आहे. या विधेयकाअंतर्गत नागरिकांना तांदूळ तीन रूपये प्रतिकिलो, गहू दोन रूपये प्रतिकिलो आणि बाजरी एक रूपया प्रतिकिलो मिळणार आहे. शहरातील ५० टक्के नागरिकांना तर गावांमधील ७५ टक्के नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी १.२५ लाख कोटी रूपये खर्च होणार असून ६.१२ कोटी टन धान्याची आवश्यकता आहे.
लोकसभे पाठोपाठ राज्यसभेने अन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी दिल्यानंतर आता केवळ राष्ट्रपतींची स्वाक्षरीची गरज आहे.
अन्न सुरक्षा विधेयकातील तरतुदी
[EPSB]
मुद्राराक्षस
प्रत्येक देशाची ‘मुद्रा’ हा त्या देशाचा ‘चेहरा’ असतो. भारतीय मुद्रेचं डॉलरच्या तुलनेतलं पतन ही वित्तीय क्षितीजावरची अतिशय गंभीर बाब असली तरी या समस्येचा मुद्राराक्षस नियंत्रणाखाली आणण्यासाठी वित्तक्षेत्रातील तज्ज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांच्या ओझ्यामुळेच या मुद्रापतनाला आणि शेअर बाजारातील हिंदोळ्यांना चालना मिळते आहे, असा लोककल्याणाविरोधी धक्कादायक प्रचार माध्यमांमधून सुरू […]
[/EPSB]