शिंदे साहेब, येत्या १० ऑक्टोबरला दै. ‘प्रहार’ आठव्या वर्षात पाऊल ठेवतंय. गेली ७ वर्षे मुंबईमध्ये, दै. प्रहार कोकणामधलं दै. प्रहार एक परिपूर्ण दैनिक म्हणून स्थान निर्माण केलंय. आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बोलावलं आहे.
प्रश्न- शिंदे साहेब, येत्या १० ऑक्टोबरला दै. ‘प्रहार’ आठव्या वर्षात पाऊल ठेवतंय. गेली ७ वर्षे मुंबईमध्ये, दै. प्रहार कोकणामधलं दै. प्रहार एक परिपूर्ण दैनिक म्हणून स्थान निर्माण केलंय. आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बोलावलं आहे. माजी गृहमंत्री म्हणून, लोकसभा सभागृहाचे माजी नेते म्हणून आणि त्याहीपेक्षा एक मोठया मनाचा एक मोठा माणूस म्हणून आपल्याला बोलवण्यात आम्हाला प्रहार परिवाराला आनंद वाटला आपलं स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय.
वृत्तपत्राची आजची एकूण परिस्थिती, गुणवत्ता आणि वृत्तपत्रांची गरज आणि त्यांच्याकडून सामाजिक बांधिलकीची अपेक्षा या संबंधात आपले निरीक्षण आपण नोंदवावे अशी आपल्याला विनंती करतो.
शिंदेसाहेब : मी इथे आज येण्याचे कारण म्हणजे मला अतिशय आनंद होतोय की, नारायणराव राणे यांचा प्रहार आज सातवं वर्ष संपवून आठव्या वर्षामध्ये पाऊल ठेवतोय. १० तारखेला प्रहारचा वर्धापन दिन होतंय ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नारायणराव राणे माझे मित्र आहेत. त्यांच्या पेपरसाठी मी इथे आलो आहे. आमच्या सहहृदय मित्रासाठी इथे येणे हे माझं अगत्यपूर्वक कामच होतं. आपण संपादक म्हणून मला निमंत्रित केलंत.
राणेसाहेबांच्या दोन्ही मुलांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. खरं जर म्हणाल ना, नारायणरावांनी दैनिक प्रहार सुरू केला त्यावेळस मला आश्चर्यच वाटलं होतं की हा माणूस राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे. त्या क्षेत्रातले सगळे पैलू त्यांनी पाहिलेले आहेत आणि सात वर्षापूर्वी ते वृत्तपत्राच्या क्षेत्रात उतरलेले आहेत. मी विधानसभेमध्ये त्यांना ऐकलेले आहे. मी मुख्यमंत्री असताना ते ज्या त-हेने अर्थसंकल्पावर बोलायचे. मी एवढे र्वष अर्थसंकल्प मांडला, पण या माणसाला अर्थसंकल्पामधलं खूप काही कळतं असं मी त्यावेळेस जाहीरपणाने म्हणालो होतो.
आता मी दिल्लीतच होतो एवढी वर्षे. पण मी दिल्लीत असताना इथे प्रहार वर्तमानपत्र नारायणरावांनी कोकणातून चालू केलं. आणि नावही मोठं सुरेख दिलं. प्रहार! कारण नारायण राणेंच्या स्वभावाप्रमाणे प्रहार करणं हा त्यांचा स्वभावच आहे. त्यांच्या वर्तमानपत्राचंही नाव तसंच आहे. आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राची सिंहगर्जना म्हणून मराठा सुरू केला. बाळासाहेब ठाकरे यांनी सामना सुरू केला, त्याचप्रमाणे काळाची गरज म्हणून नारायणरावांनी त्यांच्या वर्तमानपत्राला प्रहार हे नाव दिलं.
बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण नावाचं वृत्तपत्र होतं. दर्पण म्हणजे आरसा. समाजाचा आरसा कसा असला पाहिजे? स्वत:चं प्रतिबिंबच आपण त्यात बघितलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून ही सगळी वर्तमानपत्राच्या नावांची परंपरा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच नारायणरावांना प्रहार हे नाव सुचलं असावं. खूपच चांगले आहे हे नाव प्रहार.
अन्यायाच्या विरुद्ध प्रहार करत राहणे म्हणजे नारायणराव राणे असं मी समजतो. तुम्ही म्हणालात की हल्ली वर्तमानपत्राची गुणवत्ता बदलत चाललीय. हे खरं आहे. पूर्वी वर्तमानपत्र उघडल्यावर बरोबर पहिल्या पानावर, मुखपृष्ठावरच सगळी बातमी असायची. आजकाल अध्र्या पानाची जाहिरात, पूर्ण?पानाची जाहिरात, त्याच्या आत गेलं की आणखी जाहिरात म्हणजे दोन-तीन जाहिराती बघितल्यानंतर सगळी बातमी सुरू होते. मला आश्चर्यच वाटतं, खरं म्हणजे आता जाहिरात हा व्यवसायच आहे.
व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पेपर टिकला पाहिजे हे मला मान्य आहे. मी असं म्हणणार नाही की तोटा सहन करून पेपर काढावा. ते आताच्या काळात शक्य नाही. कारण कोणी आर्थिक मदत करत नाही. पण परिपूर्ण वर्तमानपत्र लोकांच्या हाती देणं, त्यात संपूर्ण बातम्या असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. पण ब-याच जाहिराती बघायला मिळतात. हे व्यवस्थापनाने ठरवलं पाहिजे. कारण आर्थिकदृष्टया गणित जमले पाहिजे हे मला मान्य आहे. पण मी प्रहारमध्ये बघतो, अशा प्रकारच्या लादलेल्या जाहिराती मला तिथे दिसत नाहीत.
प्रहारमध्ये पहिल्या पानावर बातमी म्हणजे बातमीच असते. मी जेव्हा जेव्हा प्रहार बघितला तेव्हा मला पाहिल्या पानावर बातमीच बघायला मिळालेली आहे. व्यवसाय म्हणून वर्तमानपत्र चाललंच पाहिजे. कारण हे मोठं बलाढय़ अशा प्रकारचं काम आहे. वर्तमानपत्र चालवणं आणि त्यात ध्येयवादी भूमिका घेऊन वर्तमानपत्र चालवणं हे किती जमेल याची माझ्या मनामध्ये शंका आहे.
अर्थात, मराठी वर्तमानपत्र जे चालतंय त्याच्यामागे फार मोठी परंपरा आहे. ती परंपरा बाळशास्त्री जांभेकरांची आहे, शिवरामपंत परांजपेंची आहे, लोकमान्य टिळकांची परंपरा आहे, आगरकरांची परंपरा आहे, आचार्य अत्रे यांची परंपरा आहे, परुळेकरांची परंपरा आहे म्हणून या सगळया परंपरेमधून एक नवा समाज घडवण्याचे काम वर्तमानपत्रांना करावे लागणार आहे.
आताचा काळ हा सगळा टेलिव्हिजनचा काळ आहे आणि या टेलिव्हिजनमधून खूप काही माहिती मिळते म्हणून वर्तमानपत्रालासुद्धा एक नवीन चॅलेंज आहे की तुमचं वर्तमानपत्र टिकून कसं राहील हे पाहिलं पाहिजे आणि जर भावेसाहेबांसारखा हरहुन्नरी संपादक असेल तर मला वाटत नाही की वर्तमानपत्र टिकणे कठीण आहे. कारण सव्यासाची वर्तमान पत्रकार आणि मी तर म्हणेन सव्यासी तर असलाच पाहिजे पण, त्याचबरोबर त्याला तरुण पिढीसाठी जी भूमिका मांडायची आहे ती भूमिकाही त्याला कळली पाहिजे. कारण संपादक ब-याच वेळेस मागच्या पिढीतला असतो. त्यामुळे सध्याची पिढी त्याला किती कळत असेल. पण पुढच्या पिढीला काय पाहिजे हे त्याला समजण्याची गरज आहे.
एकदा विनोबांच्याकडे मी गेलो होतो. खरं म्हणजे तुमचा हा पेपर कोकणातला आहे. विनोबांच्या त्या भूमीतला आहे. मी विनोबांना म्हटले होते, ‘तरुणांना काही संदेश द्या.’ तर त्यांनी एका वाक्यात मला एकदा लिहून दिले होत ‘तरुण म्हणजे तारणारा, पुढच्या अणि मागच्या पिढीला.’ तसं वर्तमानपत्राचं देखील आहे.
हा वर्तमानपत्राचा सगळा कारभार मागच्या पिढीला तारून नेतोच; पण पुढच्या पिढीला सर्व माहिती देणे, त्याच्या नव्या कल्पनांचाही त्यात उल्लेख करणं आणि त्यातून नवा समाज घडवण्याची प्रक्रिया निर्माण करणं हे आजच्या वर्तमानपत्राचं काम असलं पाहिजे असं मला स्वत:ला वाटतं आणि दैनिक प्रहार त्या कसोटीत परिपूर्ण उतरत आहे. म्हणून प्रहार परिवार आणि त्यांचे सल्लागार संपादक नारायणराव राणे, श्री. निलेश राणे, श्री. नितेश राणे या सर्वाचे मी मन:पूवर्क अभिनंदन करतो आणि प्रहारला मन:पूर्वक शुभेच्छा देतो.