अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासावर दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्यानंतर दुस-या दिवशीही सुरक्षा दल व लष्करामध्ये चकमक सुरू आहे.
मजार-ए-शरीफ- येथील भारतीय दूतावासावर दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्यानंतर दुस-या दिवशीही सुरक्षा दल व लष्करामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, अशी माहिती भारताचे अफगाणिस्तानातील राजदूत अमर सिन्हा यांनी दिली.
अफगाणिस्तानात मजार-ए-शरीफ हे महत्त्वाचे शहर असून तेथे भारताचा दूतावास आहे. पठाणकोट येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर हल्ला झाला.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापि कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. या कारवाईवर बल्क प्रांताचे गव्हर्नर अट्टा मोहम्मद नूर हे वैयक्तिकरीत्या लक्ष ठेवून आहेत. या संपूर्ण भागात संचारबंदी लागू केली आहे, असेही सिन्हा म्हणाले.
भारतीय दूतावासाबाहेर तीन दहशतवाद्यांचे मृतदेह अफगाणिस्तानच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. इंडो तिबेट पोलिसांनी दहशतवादी हल्ला परतवून लावला आहे.
[EPSB]
तिस-या दिवशीही धुमश्चक्री, पठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार
दहशतवाद्यांचा संपूर्ण नि:पात करण्यात सशस्त्र दले अपयशी ठरली असून तिस-या दिवशीही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरूच आहे.
पठाणकोट हल्ला-मोदी सरकारची त्रेधा
पठाणकोट हवाई तळावरील धुमश्चक्री तिस-या दिवशीही सुरू असल्याने संरक्षण तज्ज्ञांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.
[/EPSB]