तेलंगण सरकारने आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून तेलंगण सरकारने सहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबाद- तेलंगण सरकारने आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून तेलंगण सरकारने सहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शेतक-यांच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपये देण्यात येत होते. यामध्ये आता चौपट वाढ करण्यात आली आहे.
तसेच आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रूपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तेलंगण सरकारने घेतला आहे. या योजनेला कल्याण लक्ष्मी योजना असे नाव देण्यात आले आहे.