बिहारमधील पूरस्थिती खरोखरच अभूतपूर्व आणि गंभीर आहे. ती गंभीर असण्याचे पहिले कारण म्हणजे या पूरस्थितीत कोसी नदीला पूर आलेला आहे. कोसी नदी म्हणताच अंगावर शहारा येतो. कारण दोन वर्षापूर्वी कोसी नदीने बिहारचे प्रचंड नुकसान केलेले आहे. अनेक नद्यांना पूर येतात आणि पुरांमुळे नुकसान होते, ही गोष्ट खरी आहे; परंतु कोसी नदीचा प्रकारच वेगळा होता. तिला आलेल्या पुरामुळे तिने आपला मार्गच बदलला होता. एखाद्या नदीला पूर आला की, नदीच्या काठचे लोक सावध होतात आणि जे काही व्हायचे ते नुकसान नदीच्या प्रवाहाच्या आसपासच्या प्रदेशात होते. लोक सावध असतील तर हे नुकसान टाळतासुद्धा येतो; परंतु ज्या भागातून नदी कधी वाहिलेलीच नाही त्या भागात नदीचे पाणी अचानकपणे आले तर काय होत असेल, याचा अंदाजसुद्धा करवत नाही. दोन वर्षापूर्वी झालेले हे बिहारचे नुकसान कोसी नदीने पात्र बदलल्यामुळे झालेले आहे. १९६८ साली या नदीतून १० लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते आणि तो त्यावेळपर्यंतचा विक्रम होता. पण आता मात्र ११.२ लाख क्युसेक्स एवढया वेगाने बिरपूर बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीची जलपातळी वेगाने वाढणार आहे. खरा धोका तर असा आहे की, या धरणातून नदीमध्ये २८ लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडावे लागणार आहे. अशा वेळी नदीकाठची किती गावे जलमय होतील, याचा अंदाजसुद्धा घेता येत नाही इतके हे संभाव्य संकट भीषण आहे. कोसी नदी नेपाळमध्ये उगम पावते आणि पहाडी प्रदेशातून प्रचंड वेगाने वाहत बिहारच्या मैदानी प्रदेशात येते. परंतु आता नेपाळ आणि बिहारच्या दरम्यान नदीच्या पात्रात दरडी कोसळून दगड जमा झाले आहेत आणि नदीचा प्रवाह रोखला गेला आहे. तो रोखल्याने पाण्याचा फुगवटा नेपाळच्या बाजूने वाढत आहे आणि सतत नवे पाणी तर येतच आहे. त्यामुळे नेपाळ सरकार त्रस्त झाले आहे. नदीच्या पात्रात पडलेले हे दगड हटवावेत आणि नदीचे पाणी वाहते करावे, अशी विनंती नेपाळ सरकारने भारताला केली आहे. नदीच्या पात्रात पडलेल्या दगडांमुळे असा प्रवाह कितीसा अडणार आहे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु या दगडांचे आकारमान एक किलोमीटर एवढे आहे. म्हणजे नदीच्या पात्रात एक किलोमीटर रुंदीचा बांधच घातला गेला आहे. आता हे संकट टाळण्यासाठी या दगडाच्या बांधातून पाणी जावे, यासाठी त्या बांधाला मोठी छिद्रे पाडली गेली आहेत. त्यातून ११.२ क्युसेक्स वेगाने पाणी वाहणार आहे. हा पाण्याचा वेग १९६८ सालच्या विक्रमी प्रवाहापेक्षा १.२ क्युसेक्सने जादा आहे. मात्र हा दगडाचा एक किलोमीटर रुंदीचा बांध स्फोट घडवून उडवला तर पात्रात अडवले गेलेले सगळेच पाणी एकदम वाहायला लागणार आहे आणि तो वेग २८ लाख क्युसेक्स एवढा असेल. म्हणजे बांध असाच ठेवला तर नेपाळमध्ये पूर येणार आहे. बांध फोडून पाणी सोडले तर कोसी नदीत प्रचंड वेगाने पाणी येणार आहे. हे पाणी बिरपूर धरणापर्यंत यायला त्याला १७ तास लागणार आहेत. ते आले की, कोसीच्या काठावरील गावे पाण्याखाली जातील. ही शक्यता लक्षात घेऊन आतापर्यंत ७० हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून केंद्र, राज्य सरकारच्या आपत्कालीन यंत्रणा आणि आपत्कालीन पथके तसेच नौदलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on