बांगलादेशात होणारा आशिया चषक आणि त्यानंतर मायदेशात होणा-या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या संघांची निवड शुक्रवारी (५ फेब्रुवारी) केली जाणार आहे.
मुंबई- बांगलादेशात होणारा आशिया चषक आणि त्यानंतर मायदेशात होणा-या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या संघांची निवड शुक्रवारी (५ फेब्रुवारी) केली जाणार आहे.
राष्ट्रीय निवडसमितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीची शुक्रवारी नवी दिल्लीत बैठक होणार असून त्यावेळी दोन्ही संघांची घोषणा होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) माहितगारांनी बुधवारी सांगितले.
आशिया चषक स्पर्धेला २४ फेब्रुवारीपासून बांगलादेशमध्ये सुरुवात होत आहे. ६ मार्चपर्यंत चालणा-या या स्पर्धेत भारतासह पाच संघ सहभागी होणार आहेत. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच यंदा ही स्पर्धा ५० ऐवजी २० षटकांची (टी-२०) खेळली जाणार आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकपला ८ मार्चपासून सुरुवात होणार असून ‘सुपर टेन’मध्ये असलेल्या माजी विजेत्या भारताची सलामीची लढत १५ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध
नागपूरमध्ये होईल.