आसाममधील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे
सालबरी – आसाममधील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराचा परिणाम तेथील जनतेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जोपर्य़ंत मुख्यमंत्री तरुण गोगोई पिडिंतांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. या हिंसाचारामुळे आसासममधील अनेक नागरिक स्थलांतर करत आहेत.
राज्यातील बक्सा आणि क्रोकाझोर जिल्ह्यात आसामच्या बोडोलॅँड टेरिटोरियल अॅडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रीक्टमध्ये एनडीएफबी-सॉँगबोजित दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३२ जण ठार झाले आहेत. बक्सा जिल्ह्यातील खग्राबारी गावात नऊ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात चार मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.
netyachi tikde samor yaayla faatate…!