सतत पडणा-या पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लखनऊ – सतत पडणा-या पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील दहा जिल्ह्यांना या पूराचा फटका बसला आहे. सारडा, घागरा आणि शरयू नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे. पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिला आहे.
पूरग्रस्त भागात राहणा-या लोकांचे प्रांतिक सशस्त्र पोलिस दलाच्या (पीएसी) मदतीने स्थलांतर करण्यात येत आहे.लखीमपूर खेरी आणि सिद्धार्थनगर भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आपातकालीन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनूसार, घागरा नदी धोक्याच्या पातळीपेक्षाही दोन मीटर जास्त वेगाने वाहत आहे. बलिया आणि अयोध्या भागातून वाहणा-या शरयू नदीनेही धोक्याची पातळी पार केली आहे. त्यामुळे बस्ती, गोंदा आणि संत कबीरनगर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
सलग दोन दिवस पडणारा मुसळधार पाऊस आणि वीज कडाडून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या बहरिच भागात सर्वाधिक ८९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कुशीनगर (८०.८मिमी), गोरखपूर (६८.४ मिमी), महाराजगनी (६०.४) मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.