ठाणे महापालिकेतील सत्ताधा-यांनी मोठा गाजावाजा करून चार वर्षापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहाचे सिलिंग सोमवारी रात्री अचानक कोसळले.
ठाणे- ठाणे महापालिकेतील सत्ताधा-यांनी मोठा गाजावाजा करून चार वर्षापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहाचे सिलिंग सोमवारी रात्री अचानक कोसळले.
या घटनेत मोठी हानी टळली असली तरी निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाचे यजमानपद भूषवलेल्या ठाण्यात ही घटना घडल्याने शिवसेनेच्या बेगडी नाटयप्रेमावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ठाणे शहरात गडकरी रंगायतन हे एकमेव नाटयगृह असल्याने नाटयप्रेमींच्या सोयीसाठी काशीनाथ घाणेकर हे नवे नाटयगृह उभारण्यात आले. २०११ साली हिरानंदानी मेडोज भागात उभारलेल्या या नाटयगृहाला प्रसिद्ध अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचे नाव देण्यात आले.
महाराष्ट्रात आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सांगणा-या ठाणे शहरात नाटयप्रेमींसाठी आणखी एक सुसज्ज नाटयगृह उभे राहिले. नाटयचळवळ पुढे जावी, असा हेतू यामागे होता. मात्र उभारणीनंतर अवघ्या चार वर्षातच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या नाटयगृहाच्या पीओपी सिलिंगमधून अखंड अभिषेक होऊ लागला.
सततच्या पाणी गळतीमुळे हे सिलिंग तकलादू होऊन सोमवारी रात्री कोसळले. मात्र यावेळी नाटयगृहात कोणताही कार्यक्रम सुरू नसल्याने मोठा अपघात टळला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधितांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
ठाणे शहरात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाच्या वेळी काशीनाथ घाणेकर नाटयगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले होते. शहरातील दोन नाटयगृहांत आयोजक-संयोजकांनी हे नाटयसंमेलन घेतले होते. मात्र तरीही पालिकेतील सत्ताधा-यांना या नाटयगृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सैनिकांच्या बेगडी नाटयप्रेमाचा पर्दाफाश!
गडकरी रंगायतनच्या मानाने आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या या काशीनाथ घाणेकर नाटयगृहात वर्षाला १ हजारापेक्षा अधिक कार्यक्रम होतात. यातून ठाणे महापालिकेला मोठे आíथक उत्पन्नही मिळते. मात्र तरीही या नाटयगृहाची अशी भीषण अवस्था व्हावी, याबाबत नाटयरसिकांत नाराजी व्यक्त होत आहे. नाटयगृहाचे काम मुळात निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. यानंतर नाटयसंमेलनाच्या मंचावर मिरवणा-या ‘सनिकांना’ नाटयक्षेत्राबद्दल खरेच किती आस्था होती नि आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.